जनकल्याणाचा वसा; आणि कडवट हिंदुत्ववादी

  19

प्रत्येक तारखेचे इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते. त्या तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींकडून घडलेले अलौकीक कार्य, त्या तारखेला घडलेल्या घडामोडी यामुळे त्या तारखेची इतिहासालाही दखल ही घ्यावीच लागते. २३ जून हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील वाटचालीतील एक महत्त्वाचा दिवस. भाजपाचे युवा नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी, हिंदुत्वाचे कडवट समर्थक व राज्याचे मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा जन्मदिवस. राजकीय समज आणि उमज असणाऱ्या प्रत्येकालाच नितेश राणे यांचे नाव परिचित आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा तीन विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नितेश राणे विजयी झालेले आहेत. मोठ्या झाडांच्या अथवा वटवृक्षाच्या सावलीमध्ये लहान वृक्षांची वाढ होत नाही, असे म्हटले जाते, पण याला नितेश राणे त्यांच्या कार्यामुळे अपवाद ठरले आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय मंत्री व सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचे धाकटे पुत्र असलेले ना. नितेश राणे आज महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहात सर्वपरिचित असलेले व्यक्तिमत्त्व आहे. नारायण राणे यांचे पुत्र व माजी खासदार तसेच विद्यमान शिवसेना आमदार निलेश राणे यांचे धाकटे बंधू अशी ओळख असलेले नितेश राणे यांनी या ओळखीपलीकडेही आपले स्थान निर्माण केले आहे. घरची राजकीय पार्श्वभूमी असल्याने राजकारणातील खाचखळग्यांचे, अडीअडचणींचे बाळकडू नितेश राणे यांना बालपणापासूनच मिळालेले आहे. नितेश राणे यांनी उमजत्या वयापासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय प्रवाहात स्वत:ला झोकून देताना आज स्वत:चे स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण केले आहे. नितेश राणे आज राज्याचे मातब्बर मंत्री असले तरी एक कडवट हिंदुत्ववादी युवा नेतृत्व अशी नितेश राणेंची महाराष्ट्रात ओळख आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर कडवट हिंदुत्वाचा अनुनय करणारे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरून जणू काही लुप्तच झाले होते. ती पोकळी भरून काढण्याचे काम नितेश राणे यांनी केले आहे, असे म्हटले तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही. महाराष्ट्रात मुस्लिमांकडून ज्या-ज्या भागांत हिंदूंविरोधी घटना घडल्या, त्या-त्या ठिकाणी नितेश राणेंनी धाव घेतली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, निदर्शने झाली आहेत, मोर्चे काढण्यात आले आहेत, भव्य रॅली काढण्यात आल्या, भव्य सभा नितेश राणेंच्या झाल्या आहेत व आजही होत आहेत. लव्ह जिहादच्या घटना असो, हिंदू मुलींवर, महिलांवर अत्याचार घडलेला असो, ज्या-ज्या ठिकाणी हिंदूंवर अन्याय झाला आहे, त्या-त्या ठिकाणी नितेश राणेंनी धाव घेतलेली आहे. ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा प्रसार करणारे राजकीय चळवळीतील नितेश राणे हे सध्याचे आक्रमक नेतृत्व आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही.


देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नितेश राणे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मत्स्य विकास आणि बंदरे विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. काही लोकांना खुर्चीमुळे ओळखले जाते, तर काही लोकांना आपल्या कार्यामुळे त्या खुर्चीला आणि पदाला एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. नितेश राणे हे दुसऱ्या पठडीत मोडणारे नेतृत्व आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना त्यांनी पहिल्या दिवसापासून सागरी किनारा, मत्स्य व्यवसाय, सागरी पर्यटन, सागरी सुरक्षा या विषयाला चालना देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राला लाभलेला सागरी किनारा, खाडी किनारा पाहता त्या सागरी व खाडी किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी नितेश राणेंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. २६/११च्या सागरी हल्ल्यानंतर राज्यातील सागरी सुरक्षेचे धिंडवडे जागतिक पातळीवर निघाले होते. ते ध्यानात घेऊन मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी सागरी सुरक्षेवर भर देण्यास प्राधान्य दिले आहे. सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा, तेथील सीसीटीव्ही यंत्रणा, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणी याद्वारे कामाला गती देताना सागरी सुरक्षा या विषयाचे गांभीर्य त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून सरकारच्याही निदर्शनास आणून दिले आहे. १९५२ पासून अनेक पक्षांची राज्य सरकारे बनली आणि गेली; परंतु सागरी सुरक्षा आणि मत्स्य विभागाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून आता जितके कार्य होत आहे, तितके कार्य कोणत्याही सरकारच्या काळात झाले नाही. कारण या खात्याला प्रथमच नितेश राणेंच्या माध्यमातून एक अभ्यासू व प्रामाणिकपणे, तळमळीने काम करणारे मंत्री लाभले आहेत. मासेमारीला यापूर्वी कधीही कृषी विभागाचा दर्जा मिळाला नव्हता. मासेमारी करणाऱ्यांना खाडीमध्ये, सागरामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत असे. मोठ्या बोटी, ट्रोलर्समुळे लहान मच्छीमारांच्या व्यवसायावर नव्हे, तर अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा वेळी त्यांनी लहान मच्छीमारांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रशासकीय पातळीवर संरक्षण व सहकार्य मिळवून देण्याचे काम नितेश राणे यांनी केले आहे. मासेमारीला कृषी व्यवसायाचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयीन पातळीवर अथक प्रयत्न केले, पाठपुरावा केला. मासेमारीला शेतीचा दर्जा मिळणे का आवश्यक आहे, हे त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना व प्रशासनातील अधिकाऱ्यांना पटवून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ राजकारणातील चाणक्यच नाहीत, तर खऱ्या अर्थाने रत्नापारखी आहेत. त्यांना रत्नांची जाण असल्याने कोणते रत्न कोणत्या कोंदणात बसविल्यास त्याचा जनसामान्यांना फायदा होईल, याची त्यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी नितेश राणे यांच्या कर्तृत्वाला योग्य संधी दिली. त्यांच्या परिश्रमाला फडणवीसांनी न्याय दिला. राज्यातील मच्छीमार समाजावर होत असलेला अन्याय त्यांच्याही निदर्शनास आला. नितेश राणे यांच्या परिश्रमाचे चीज झाले आणि मासेमारीला शेतीचा दर्जा मिळाला. १९५२ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात जे शक्य झाले नाही, ते नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शक्य करून दाखविले आहे. राज्यातील सागरी सुरक्षा, ड्रोनद्वारे पाहणी, मुंबईकरांसाठी वॉटर बोटची सुविधा यासाठी नितेश राणे मुंबईच्या मंत्रालयापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत धावपळ करत असतात, पाठपुरावा करत असतात, हे महाराष्ट्रातील जनतेने या सरकारच्या काळात जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. संघटना बांधणी, जनता दरबाराच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या समस्यांचे निवारण, मत्स्यविभागाला अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांचे अहोरात्र परिश्रम, एक हिंदुत्ववादी नेता म्हणून कार्य करताना महाराष्ट्राचा पिंजून काढलेला कानाकोपरा अशा विविध क्षेत्रांतील परिश्रमामुळे आज नितेश राणे हे युवा नेतृत्व तावून सुलाखून निघालेले आहेत. या नेतृत्वाचा जन्मदिवस हा खऱ्या अर्थाने एक सोहळा बनविण्याची तुमची आमची जबाबदारी आहे. चांगल्या माणसाच्या कार्याची पाठराखण केल्यास त्या माणसाच्या नेतृत्वाला भरारी मारण्याचे पाठबळ मिळते. ती संधी आपणाला यानिमित्ताने प्राप्त झालेली आहे. जनकल्याणाचा वसा घेतलेल्या नितेश राणेंना वाढिदवसाच्या उदंड शुभेच्छा!

Comments
Add Comment

एकनाथ शिंदे आक्रमक, उबाठा सेना हतबल

शिवसेना पक्षाचा मेळावा मुंबईत संपन्न झाला. यापूर्वी शिवसेना पक्षाचा १९ जून रोजी एकच मेळावा व्हायचा. पण एकनाथ

अरण्यातले वनऋषी

ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्यऋषी असे ज्यांना आदराने नाव दिलेले होते असे मारूती चितमपल्ली यांना वयाच्या ९३ व्या

हिंदी भाषेवरून वाद हे दुर्दैव!

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्रातील मोदी सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आला. तसे पाहायला

शिक्षणाचा नवा पर्याय; अकरावीला वळसा

तुम्ही कितीही हुशार असाल, तरीही "ग्रॅज्युएट नसाल तर तुमच्या हुशारीची किंमत शून्य करणारी मानसिकता गेल्या काही

पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती नको...

अहमदाबाद येथील भीषण विमान अपघाताच्या स्मृती द्याप ताज्या असतानाच महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्यांत दोन

इराण-इस्रायल संघर्षाचे परिणाम भारतावर

इराण आणि इस्रायल यांच्यात सध्या भीषण संघर्ष सुरू आहे आणि त्याची किंमत भारताला मोजावी लागणार आहे. त्याची किंमत न