शहापुरात ३२७ गाव-पाड्यांमध्ये स्मशानभूमीची गैरसोय

  50

पावसाळ्यात मृतदेहाचे दहन करण्याचा प्रश्न गंभीर


शहापूर : आदिवासी नागरिकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या शहापूर तालुक्यात सुमारे ३२७ गाव-पाड्यांमध्ये स्मशानभूमीच नसल्याची बाब उघडकीस आली आहे. स्मशानभूमी अभावी मरणानंतरही मृतदेहाची हेळसांड होत असून पावसाळ्यात मृतदेहाचे दहन करण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.



ठाणे जिल्ह्याचा शहापूर तालुक्यात प्रामुख्याने आदिवासी नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये ११० ग्रामपंचायतींमध्ये २२७ गावे आणि ५१४ पाडे येतात. तालुक्यात तानसा, दापूर, कसारा (खु), भुईशेत, भोयेपाडा, गरेलपाडा, सावरदेव, पेंढरी, बोराळा, वारलीपाडा, भेकरमाळ, सावरखुट, उठावा, दापूरमाळ अशा ३२७ गावपाड्यांवर स्मशानभूमी नसल्याचे उघडकीस आले आहे. येथील ग्रामस्थांना पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. गावपाड्यांमधील अंतर्गत वाद या मुख्य कारणामुळे बहुतांशी ठिकाणी स्मशानभूमीची कामे मंजूर होऊन देखील ती रखडलेली आहेत.

तर, स्मशानभूमीचे पत्रे उडणे, स्मशानभूमी जमीनदोस्त होणे, स्मशानभूमीसाठी वनखात्याच्या जागेची अडचण, खाजगी जागेची अडचण, तर काही ठिकाणी रस्ता नसणे यामुळे स्मशानभूमी निर्मितीत अडचणी निर्माण होत आहेत. आदिवासी अतिदुर्गम भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तालुक्यातील नागरिकांना स्मशानभूमीसाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते आहे. तर, काही ठिकाणी नदीतून मृतदेह न्यावे लागत आहेत. तर, उर्वरित स्मशानभूमीत छत नसल्याने उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे उघडकीस येत आहे. पावसामुळे मृतदेहाची हेळसांड होत असून शहापूर तालुक्यात हा प्रश्न गंभीर होत आहे. शहापूर तालुक्यात ११० ग्रामपंचायतींमध्ये २२७ गावे आणि ५१४ पाडे येतात. तालुक्यात आरसीसी बांधकाम असलेल्या १९७ स्मशानभूमी आहेत. तसेच, २३१ स्मशानभूमी सुस्थितीत आहेत. तर, ३२६ ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या स्मशानभूमी नसून २२९ ठिकाणी स्मशानभूमींची पडझड झाली आहे. तसेच जमीन उपलब्ध नसल्याने देखील २२९ ठिकाणी स्मशानभूमी रखडल्या आहेत. याशिवाय बहुतांशी ठिकाणी रस्ते, वीज आणि पाण्याची सुविधा नसल्याने अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे.
Comments
Add Comment

ठाण्यात अवघ्या २० लाखांत स्वप्नातले घर

म्हाडाकडून तब्बल ६२४८ घरांसाठी लॉटरी ठाणे  : ठाण्यामध्ये घर घेण्याचा विचार करत करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. म्हाडा

ठाणे-पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या उभारणीत ऐतिहासिक टप्पा

साखरे गावात देशातील सर्वात जड बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या बसवला ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या

ठाणे-पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या उभारणीत ऐतिहासिक टप्पा

साखरे गावात देशातील सर्वात जड बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या बसवला ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या

ठाणे महापालिकेच्या ३३ अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

सीआरझेड क्षेत्रातील बांधकामेही उद्ध्वस्त ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट

खचलेल्या रस्त्याचे काम नियमानुसार नसल्याचे मनपाला एमएमआरडीएचे पत्र

भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक भागातील रस्ता खचून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डरवर गुन्हा

ठाणे जिल्ह्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात

जिल्हा कृषी विभागाकडून ८० क्विंटल बियाणांचा पुरवठा ठाणे : पावसाने चांगलाच जोर धरला असल्याने शेतकरी सुखावला