
तेथील स्थानिक लोकांच्या माहितीनुसार घाटकोपर परिसरातील पंतनगर भागात असेलल्या रमाबाई कॉलनीमधील शांती सागर इमारतीत रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागलेली होती. या इमारतीच्या विद्युत मीटर केबिनमध्ये आग लागली असल्यामुळे इमारतीतील वायर जळून खाक झाल्या. ही आग लागल्यानंतर इमारतीतील भयभीत झालेल्या लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. आग लागल्यानंतर लोकांची पळापळ सुरु झाली, त्यामुळे काही इमारतीच्या मजल्यावर लोक अडकले होते.
शांतीसागर इमारतीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशामक दलाने तातडीने घटना स्थळी धाव घेतली. अग्नीशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन ही आग तीड तासात आटोक्यात आणली. या आगीत १३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. जखमी झालेल्या रुग्णांमध्ये ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. यातील १२ जणांवर उपचार सुरु आहेत, जखमी झालेल्या एका रुग्णाची प्रकृती ठिक असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.