खासगी जलमापके बंद असल्यास अंदाजित बिले येणार दुप्पट

महापालिकेने प्रचलित जलआकाराच्या नियमांमध्ये केली सुधारणा


मुंबई: मुंबईकरांना वितरीत करण्यात येणाऱ्या पाण्याच्या देयकांची रक्कम जलआकारांतर्गत वसूल करण्यात येत असून यापुढे पाण्याचे मोजमाप ठेवणारी खासगी जलमापके बंद असल्यास यापूर्वीच्या सरासरी रकमेवर १०० टक्के अधिक शुल्क आकारले जाणार आहे, तर झोपडपट्टी भागांमध्ये जलमापके बंद राहिल्यास पूर्वीच्या सरासरी बिलाच्या रकमेवर २५ टक्के अतिरिक्त शुक्ल आकारले जाणार आहे.


महापालिकेने याबाबत नियमावलीत पोटनियमांमध्ये बदल करून या सुधारीत नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे खासगी जलमापके बंद असल्यास त्यांना अंदाजित दुपटीने बिले पाठवली जाणार आहेत.


मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईतील जनतेला सुमारे ४१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. पिण्यासाठी तसेच इतर वापरासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या घरगुती आणि कमर्शियल वापराच्या पाण्याची देयके जल आकार नियमावली आणि मलनिःसारण व टाकाऊ पदार्थ निष्कासन नियमावलीअंतर्गत जारी केली जातात. या नियमावलीतील सुधारीत पोट नियमांमध्ये सुस्पष्टता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. याबाबत सुधारीत पोट नियमांना महापालिकेने मंजुरी
दिली आहे.


या जुन्या नियमांमध्ये, खाजगी जलमापक ६ महिन्यांहून अधिककाळ जर नादुरुस्त असेल तर अंदाजित वापर म्हणजे पाण्याची दैनिक गरज किंवा मागील कालावधीतील प्रत्यक्ष वापराच्या आधारावर संगणना करुन काढलेला वापर यापैकी जो जास्त असेल तो असेल तसेच त्या वापरावर २५ टक्के अधिक वाढ करण्यात येईल,असे नमुद होते.


परंतु आता सुधारणा करून अशाप्रकारे खासगी जलमापक सहा महिन्यांहून अधिक कालावधीसाठी बंद असल्यास पूर्वीच्या २५ टक्क्यांऐवजी १०० टक्के अधिक वाढ प्रस्तावण्यात आली आहे. त्यामुळे सरासरी अंदाजित पाण्याची जेवढी रक्कम येणार आहे, त्यावर १०० टक्के अधिक वाढ करून खासगी जलमापक असणाऱ्या ग्राहकाला दुपटीने अंदाजित बिले पाठवली जणार आहेत.


तसेच खासगी जलमापक जर सहा महिन्यांहून अधिक काळ वाचनास उपलब्ध नाही किंवा जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत आहेत अशा पाण्याच्या वापरावर नोटीस देण्यासापेक्ष २५ टक्के अधिक वाढ लागू होणार आहे. तसेच जर झोपडपट्टीतील निवासी खाजगी जलमापक जर १२ महिन्यांहून अधिक काळ नादुरुस्त असेल तर त्यांना अंदाजित बिले पाठवली जातात, त्याऐवजी आता सरासरी अंदाजित रक्कम जेवढी येईल त्यावर १०० टक्के अधिक वाढ केली जाणार आहे, तर १२ महिन्यांपासून अधिक काळ वाचनास उपलब्ध नसेल किंवा जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत असेल तर अंदाजित बिलावर २५ टक्के अधिक वाढ केली जाणार आहे.


त्यानुसार आता पाण्याच्या बिलांमध्ये बंद पडलेल्या आणि वाचनासाठी उपलब्ध नसलेल्या जलमापकांसाठी अंदाजित शुल्क आकारताना नवीन नियमावलीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे पाण्याची वापराचे अचूक मापन करणारी जलमापके सुस्थितीत नसतील तर अंदाजित बिले टाळण्यासाठी लगेच बदलून घ्या.

Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता