
पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. तर मृत व्यक्तीमध्ये संकेत घाडी, संतोष गावकर, रोहन नाईक आणि सोनू कोळंबकर या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर
दरम्यान, या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांभुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे रिक्षातील प्रवाशांचे प्राण गमवावे लागले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूढील कारवाई सध्या केली जात आहे. मात्र या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी मध्य धुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतलं. तसंच पुढील तपासणी सुरू केली आहे.