IND vs ENG: ऋषभ पंतने शतक ठोकून रचला 'महाविक्रम', धोनी-साहाला टाकले मागे

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant)ने आणखी एक शानदार शतक ठोकून इतिहास रचला आहे. पंत आता भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा नियुक्त यष्टीरक्षक बनला आहे. विशेष म्हणजे हे त्याच्या कारकिर्दीतील सातवे कसोटी शतक आहे, याद्वारे त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (६ शतके) आणि वृद्धिमान साहा (३ शतके) यांना मागे टाकले आहे.

लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या कसोटीत पंतने कर्णधार शुभमन गिलसोबत मोठी भागीदारी केली आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. पंतची खेळी केवळ तांत्रिकदृष्ट्या मजबूत नव्हती, तर इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध त्याच्या आत्मविश्वासाने आणि आक्रमक शैलीने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ आहे.

पंतची जबरदस्त कामगिरी


पंतने त्याच्या वादळी खेळीद्वारे आणखी अनेक विक्रम रचले आहेत. शतक पूर्ण करताना पंतने १० चौकार आणि चार षटकार मारले. इंग्लंडमधील पंतचे हे तिसरे कसोटी शतक होते. पंतने परदेशातील भूमीवर एकूण ५ कसोटी शतके आणि मायदेशात २ कसोटी शतके ठोकली आहेत. इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध ३ शतके करणारा पंत हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे.



इंग्लंडचा कसोटी संघ: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

भारतीय कसोटी संघ: केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड-भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक


पहिली कसोटी: जून २०-२४, हेडिंग्ले (लीड्स)

दुसरी कसोटी: 2-6 जुलै, एजबॅस्टन (बर्मिंगहॅम)

तिसरी कसोटी: 10-14 जुलै, लॉर्ड्स (लंडन)

चौथी कसोटी: 23-27 जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)

पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, ओव्हल (लंडन)

 
Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी