
भिवंडी नपा प्रशासनाकडून दिले आदेश
भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात परवानगीशिवाय चालणाऱ्या बेकायदेशीर शाळांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भिवंडीतील बेकायदा शाळांविरोधातील कारवाईची मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने केली असून आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर याची दखल घेत मनपा प्रशासनाने बेकायदा शाळांचे वीज आणि पाणी जोडणी खंडीत करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केल्या सूचना मुंबई : महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य ...
महानगरपालिका प्रशासनाने घोषित केलेल्या १८ बेकायदेशीर शाळांव्यतिरिक्त आणखी ५ अनधिकृत शाळांची यादी देऊन परवानगीशिवाय चालणाऱ्या सर्व शाळांवर कारवाई करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने केली आहे. १५ दिवसांत बेकायदेशीर शाळांवर कारवाई न केल्यास, पक्ष महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे. याची दाखल घेत पालिकेने अवैध शाळांचे पाणी आणि वीज खंडित करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत.
शिक्षण विभाग, महाराष्ट्र आणि भिवंडी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन शहरात चालणाऱ्या अनधिकृत शाळा आणि महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी मायनॉरिटी विभागाचे भिवंडी शहर अध्यक्ष अब्दुल गनी खान यांनी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी शहरात सुरू असलेल्या १८ बेकायदेशीर शाळांची यादी जाहीर केली होती. तरी देखील शहरात बेकायदेशीर शाळा सुरू आहेत.
या शाळांमुळे सरकारी शाळा बंद होत आहेत. या अनधिकृत शाळांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि या शाळा चालवणाऱ्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आहे. तसेच या अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धस्त होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या शाळांवर कारवाई न झाल्याने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे.
शिक्षण विभागाने बेकायदेशीरपणे चालणाऱ्या अर्धा डझनहून अधिक बेकायदेशीर शाळांची नावे यादीत समाविष्ट केलेली नाहीत. त्यामुळे या निवेदनात महापालिकेच्या यादीत समाविष्ट नसलेल्या ६ बेकायदेशीर शाळांची यादी देखील जोडली आहे.
महापालिकेने बेकायदेशीर शाळांबाहेर शाळा अनधिकृत असल्याचे बॅनर लावले जाईल. ज्यामध्ये पालकांना त्यांच्या मुलांना बेकायदेशीर शाळांमध्ये प्रवेश देऊ नये अशी विनंती केली जाईल. यासोबतच लवकरच बेकायदेशीर शाळांवर गुन्हा दाखल केला जाईल. ज्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे.
- बाळकृष्ण क्षीरसागर, महापालिका शिक्षण
विभाग उपायुक्त