बालनाट्य टिकलं पाहिजे

  42

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


अंजू उडाली भुर्रर्र हे बालनाट्य सध्या चर्चेत आहे. त्या बालनाट्यामध्ये महत्त्वाची चेटकिणीची भूमिका साकारणारी कलावंत देखील चर्चेत आहे. लहान मुले सुरुवातीला तिला पाहून घाबरतात, नाटक बघण्यास नकार देतात, नाट्यगृहाच्या बाहेर जाण्याचा आग्रह धरतात; परंतु पालकांनी समजविल्यानंतर ते पूर्ण नाटक बघतात. चेटकणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांना घाबरविणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे पूर्णिमा अहिरे.


दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये पूर्णिमाचे शालेय शिक्षण झाले. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला होता. यानंतर त्यांनी पुढे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पुढे त्यांनी नाट्यवलय जॉइन केलं. तिथे ऑडिशन दिल्यावर त्यांचे सिलेक्शन झाले. तेथे संजय नार्वेकरने त्यांना अभिनय शिकवला.


त्यानंतर त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. संतोष पवार दिग्दर्शित असा मी अशी मी या नाटकात त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांच्या यदा कदाचित या नाटकात त्यांनी केलेली गांधारीची भूमिका खूप गाजली. आजही प्रेक्षक, अभिनेते त्यांना गांधारी नावानेच ओळखतात. आजही सचिन पिळगावकर त्यांना गांधारी नावानेच हाक मारतात. श्यामची मम्मी, जाऊ बाई जोरात ह्या नाटकात त्यांनी कामे केली. त्यानंतर काही मालिकेत देखील त्यांनी कामे केली. वहिनीसाहेब, अवघाची संसार या त्यांनी काम केलेल्या मालिका गाजल्या. त्यांनी केलेले पछाडलेला, अगं बाई अरेच्चा हे चित्रपट गाजले.


अंजू उडाली भुर्रर्र हे राजेश देशपांडे दिग्दर्शित बालनाट्य सध्या सुरू आहे. यामध्ये वाईट चेटकणीच्या भूमिकेत त्या आहेत. लहान मुले त्यांना सुरुवातीला पाहून घाबरतात; परंतु नंतर हळूहळू ते त्या नाटकात रमू लागतात. अंजू नावाची मुलगी उडून जाते, नंतर तिला चेटकीण भेटते. शेवटी ती परत कशी येते. हे सारे या नाटकात पाहायला मिळेल. बाल दोस्तांसाठी हे बालनाट्य म्हणजे एक मनोरंजनाचा खजिना आहे.


बालनाट्याला बुकिंग मिळत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. बालनाट्य टिकले पाहिजे. आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. बालदोस्तांची मेहनत असते, आम्हा कलाकार, दिग्दर्शक, नाटकातील इतर घटकांची देखील मेहनत खूप महत्त्वाची असते. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी बालनाट्य टिकले पाहिजे.

Comments
Add Comment

रंगमंचीय नाट्यकलेची कृष्णकळा...

राजरंग : राज चिंचणकर श्री  कृष्ण आणि त्याचे अवतारकार्य हा कायमच औत्सुक्याचा व अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे.

‘वळू’चित्रपटाने बदलली दिशा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल पिंपरी-चिंचवडमध्ये नाटक येत नाही, त्यामुळे नाटक पाहता येत नाही, ही खंत आईने व्यक्त

प्रत्येकाचा कृष्ण...

आसावरी जोशी : मनभावन धी तू भरगच्च फुलांनी सजलेला. अगदी नखशिखांत. लालस फुलांच्या लालीने तू अधिकच निरागस दिसू

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद माझा आणि घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला संबंध आला तो राज्यनाट्य फायनलच्या प्रयोगाला.

Face Cake Smash Trend: मित्रांच्या वाढदिवसानिमित्त कधीही करू नका अशी मस्करी, जाऊ शकतो जीव, पहा हा Viral Video

Face Cake Smash Trend: आजकाल वाढदिवस म्हंटला की, प्रत्येकजण खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतात, लेट नाईट पार्ट्या केल्या जातात.

राजिंदर नाथ

मराठी नाटकांना हिंदीत नेणारा रंगकर्मी भालचंद्र कुबल : पाचवा वेद गेल्या आठवड्यात अखिल भारतीय नाट्यसृष्टीतील