WEF News: World Economic Forum कडून भारताचे कौतुक भारताने उर्जेच्या क्षेत्रात केली उल्लेखनीय प्रगती - रिपोर्ट

प्रतिनिधी: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) कडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे. त्यासंबंधात त्यांनी एक नवा अहवाल प्रसिद्ध करून त्यात ' जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने चौथ्या क्रमांकावर झेप घेताना जागतिक उर्जेच्या परिवर्तनात भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. केवळ झपाट्याने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे नाही तर जगभरात भरमसाठ वाढत असलेल्या उर्जेच्या उत्सर्जनामुळे, तसेच जागतिक उर्जा धोरणात होत असलेल्या बदलात भारत मोठी भूमिका बजावत आहे ' असे जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्था वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या अहवालात म्हटले आहे.


जगातील महत्वाचे उर्जा हे संसाधन वाचवणे हे भल्या अर्थव्यवस्थेसह शक्य असते. अशा वेळेत भारताने गगनभरारी घेत आपली नवी नेतृत्वशैली जगासमोर आणली आहे. यानुसार युनायटेड स्टेट्स,चीन,युरोपियन युनियन,जपान,भारत या अर्थ व्यवस्थेच्या प्रयत्नासह टिकाऊ उर्जा (Sustainable Energy) क्षेत्रात मोठे कार्य होऊ शकते. अशातच भारत या पारंपरिक ऊर्जा व नवउर्जा संसाधनांसाठी पुढाकार घेत आहे.


या ५ अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास जगातील अर्धी लोकसंख्या या देशांमध्ये राहते. म्हणूनच या देशातून पर्यावरणाला हानिकारक असणारे उर्जेचे किंवा कार्बन उत्सर्जन (Carbon Emission) होत असते. यासंदर्भात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने म्हटल्याप्रमाणे, चीन व भारताने उत्सर्जन मर्यादित केल्याचे म्हटले आहे. भविष्याचा विचार करतानाच तंत्रज्ञानासह शाश्वत विकासाकरता भारत अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनर्जी, विशेषतः स्वच्छ इंधनसह भारताने इक्विटीत आघाडी जगभरात आघाडी राखली आहे. भारताने यासाठी व तंत्रज्ञानासह उत्सर्जन नियंत्रणासाठी मोठी गुंतवणूक व मेहनत केल्याचा दावा या अहवालात केला गेला आहे. तथापि भारताने ग्रामीण भागात इलेक्ट्रिसिटीचा मुबलक पुरवठा, उर्जेच्या आयातीवरील अवलंबन, ग्रामीण भागातील शाश्वत विकासात आणखी प्रगती करण्याची आवश्यकता असल्याचेही या अहवालात नमूद केले गेले आहे.


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचेही कौतुक करत भारताच्या स्वच्छ उर्जेच्या विविध स्तरांवर व विविध राज्यांतील प्रयत्नांना दुजोरा दिला आहे. नुकताच भारताने गुजरातमध्ये केमिकल इंडस्ट्री, तमिळनाडूत नव्या अक्षय उर्जेचा (Renewable Energy) प्रकल्प उभारले होते. त्यावर कौतुकाची थाप जागतिक स्तरावर भारताला मिळाली. नॅशनल इनव्हेसमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (National Investment and Infrastructure Fund NIIF) यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. स्वच्छ उर्जेच्या व स्वच्छ इंधनांच्या वाढीसाठी भारत खाजगी गुंतवणूकीला व परदेशी गुंतवणूकीला देखील चालना देत आहे. याचाच एकत्रित परिणाम म्हणून भारतात नव्या शाश्वत विकासाकडे मार्गक्रमण करत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतासह ७६ देशांनी आपल्या उर्जा परिवर्तनात चांगली कामगिरी केली आहे. त्यातील अहवालानुसार, केवळ २८ टक्के देशांनी सर्वांगिण विकासाची नोंद केली आहे.भारत यामध्ये मोठ्या प्रमाणात शाश्वत विकासाकडे तेजीने मार्गक्रमण घेत असल्याने जागतिक स्तरावर याची दखल घेतली जात आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Pak: पाकविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार ? सूर्यकुमारने स्पष्टच सांगितलं...

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

Narhari Zirwal: "चौकशीत नाव आलं तर..."; ACB च्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड

निवडणुकांनंतर अहिल्यानगरमध्ये गोळीबाराची घटना; एकाचा मृत्यू, रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती

अहिल्यानगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात दोन गटांतील

लोणावळातील लायन्स पॉइंट परिसरात पुन्हा आढळला मृतदेह; पोलिस तपास सुरू

लोणावळा : पुण्यातील लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, पण हेच ठिकाण