पालघर : मुंबईकडून अजमेरच्या दिशेने जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेस (Ajmer Express Train) पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये दोष झाल्याचे निष्पन्न होऊन विद्युत तारा तुडल्याच्या निदर्शनास आले, त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच मुंबईतून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवून दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुरुस्तीच्या कामासाठी काही अवधी जाऊ शकतो अशी शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
रेल्वेचा तांत्रिक बिघाड साधारणपणे ७:30 च्या सुमारास झाला आहे अशी माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली. रेल्वे प्रशासनाने सर्तकता दाखवत सायरन वाजून लोकांना अलर्ट केल्याने लोकांनमध्ये भीतीचं वातावरण आहे. अजमेर ट्रेन गुजरातकडे जाणारी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर एक नंबर व दोन नंबर ट्रॅक क्रॉस करत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुडली. या घटनेमुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली. पाऊस सुरु असल्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे प्रवाशांनी ट्रॅक वरुन उतरणे किंवा चालणे टाळावे. अशा सुचना रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आहेत.