मेट्रो-३ मार्गिकेच्या बीकेसी, वरळी स्थानकांत छतातून पाणी गळती

मुंबई : मुंबई मेट्रो-३ प्रकल्पातील बीकेसी आणि वरळी स्थानकांमध्ये गळतीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी साचल्याच्या घटनेनंतर आता वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मेट्रो स्थानकात भिंतींना ओलावा, छतातून पाणी गळती असे दृश्य दिसून येत आहेत. याआधी गळती रोखण्यासाठी एमएमआरसीने पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.


आता गळतीच्या ठिकाणी कर्मचारी सातत्याने पाणी पुसताना दिसत आहेत. प्रवाशांनीही यासंदर्भात सोशल मीडियावर फोटो शेअर करत टीका केली आहे.


सर्वसामान्य नागरिक, प्रवाशांनी समाजमाध्यमांवर मेट्रो स्थानकातील गळतीची छायाचित्रे, चित्रफिती पोस्ट करून 'मेट्रो-३'च्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. वरळी आणि बीकेसी मेट्रो स्थानकांत होत असलेल्या गळतीविषयी विचारणा केली असता एमएमआरसीने बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप फेटाळून लावला. काही ठिकाणी गळतीच्या किरकोळ समस्या उद्भवत असून त्याची कंत्राटदारांकडून तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात येत आहेत.


मेट्रो ३ वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासूनचा हा पहिलाच पावसाळा आहे. त्यामुळे आवश्यक ती दुरुस्ती करून घेतली जात आहे.

Comments
Add Comment

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द..-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर

Navi Mumbai : सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा; अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीने रहिवाशांना मारहाण

नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील

९ मार्च पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती..

-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा मुंबई : वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा