
लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनला लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर आजपासून सुरू झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून दिवसअखेर भारताने ३ बाद ३५९ धावा केल्या आहेत. शुभमन गिल १२७ आणि ऋषभ पंत ६५ धावांवर नाबाद आहेत. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी १९८ बॉलवर १३८ धावांची भागीदारी केली आहे.
पहिल्या डावात भारतीय संघाची सुरूवात शानदार राहिली. केएल राहुल आणि यशस्वी जायसवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. केएल राहुल बाद झाल्यानंतर या भागीदारीचा अंत झाला. राहुलला ब्रायडन कार्सने बाद केले. त्याने ७८ बॉलमध्ये ४१ धावा केल्या. यात ८ चौकारांचा समावेश होता.
लंचनंतर यशस्वी जायसवाल आणि शुभमन गिलने डाव पुढे नेला. दोघांमध्ये शतकी भागीदारी झालली. या भागीदारीदरम्यान यशस्वीने ८ चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
शुभमनने कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या डावात ५० आणि त्यापेक्षा अधिक धावा करणारा नववा भारतीय आहे. सोबतच शुभमन सगळ्यात कमी वयाचा भारतीय कर्णधार आहे. त्याने कर्णधार म्हणून एका डावात ५० आणि त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
यशस्वी जायसवालने १४४ बॉलमध्ये शतक पूर्ण केले. यशस्वीने कसोटी करिअरमधील ५वे शतक ठरले. दरम्यान, शतकानंतर यशस्वी अधिक काळ क्रीझवर टिकू शकला नाही. बेन स्टोक्सने त्याला बाद केले. यशस्वीने १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५९ बॉलमध्ये १०१ धावा केल्या. यशस्वी आणि शुभमन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली.
यशस्वी बाद झाल्यानंतर शुभमन गिलने ऋषभ पंतसोबत डाव पुढे नेला. दोघांनी शतकी भागीदारी करत भारताला चांगल्या स्थितीत आले. गिलने १४० बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. यात त्याने १४ चौकार ठोकले. तर पंतने ९१ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले.