
मुख्यमंत्री जळगाव येथे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी म्हणून आले होते. या प्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना उद्धव यांच्या भाषणाचा संदर्भ देत प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांना मार्मिक उत्तर दिले. यानंतर मुख्यमंत्री इतर विषयांवर विस्तर बोलले.
नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
मुंबईत गुरुवार १९ जून रोजी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे तिकडे गाठीभेटी घेत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
🕙 10.05am | 20-6-2025📍Jalgaon.
LIVE | Media Interaction #Maharashtra #Jalgaon https://t.co/1aXm4Td94p
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 20, 2025
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. यावेळी बोलताना, बोल बच्चनना मी उत्तरे देत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमदार एकनाथ खडसे कार्यक्रमाला येणार का, या प्रश्नावर माहिती नाही, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.