
मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या कर्मावर त्याला त्याचे फळ मिळत असते. काही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा मिळते तर काही कामे केल्याने सकारात्मकता मिळते. अशातच अशी काही कामे आहेत जी केल्याने व्यक्ती कंगाल बनू शकते.
खोटी शपथ घेऊ नका
जे लोक मजा मस्तीमध्ये कोणाचीही खोटी शपथ घेतात अशा लोकांना अनेकदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे कधीही खोटी शपथ घेऊ नका.
आंघोळ करताना लघवी करणे
जे लोक आंघोळ करताना लघवीची सवय असते अशा व्यक्ती गरीब असू शकतात. याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो.
घरात थुंकू नये
कधीही घराच्या आत थुंकू नये. जे लोक घरात इकडे तिकडे थुंकतात त्यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. यामुळे आजारही पटकत होतात.
महिलांनी उभे राहून केस विंचरू नये
ज्या घरात महिला उभ्या उभ्या केस विंचरतात त्या घरात कधीही लक्ष्मीचा वास होत नाही. महिलांना नेहमी कोणत्या ना कोणत्या आसनावर बसून केस विंचरले पाहिजे.
तुटलेल्या चपला घरात नको
घरात कधीही तुटलेल्या चपला ठेवू नका. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.