Thursday, June 19, 2025

विमान अपघात, असे सुरू आहे DNA द्वारे मृतांची ओळख पटवण्याचे काम

विमान अपघात, असे सुरू आहे DNA द्वारे मृतांची ओळख पटवण्याचे काम

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI 171 या अहमदाबाद - लंडन विमानाला अपघात झाला. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. अनेक मृतदेह अपघातामुळे अर्धवट जळून गेले होते. यामुळे विमान अपघातातील सर्व मृतांची DNA द्वारे ओळख पटवण्याचा निर्णय झाला. या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब सज्ज करण्यात आली. यानंतर सुरू झाले भारतातले आतापर्यंतचे सर्वात मोठे मृतांची DNA द्वारे ओळख पटवण्याचे काम. हे कठीण काम करण्यासाठी ४० कुशल तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले. यात फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉक्टर आणि सपोर्टिंग स्टाफ असा ताफा होता. या सर्वांनी न थकता, न कंटाळता, न थांबता प्रयत्न केले आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले.


अपघात झाला त्यावेळी विमानाचे तापमान थोड्या वेळासाठी एक हजार से. पेक्षा जास्त झालो होते. या आगीचा तडाखा बसलेल्या प्रवाशांपैकी अनेकांचे मृतदेह अर्धवट जळून गेले होते. यामुळे मृतांची ओळख पटवण्याचे काम कठीण झाले होते. वेळ झपाट्याने निघून जात होता. यामुळे रात्रंदिवस काम करण्याचा निर्णय झाला.


असे जुळवले डीएनए




  • मेघानी नगर येथील अपघात स्थळावरुन मृतदेह आणि मृतदेहांचे अवशेष काळजीपूर्वक गोळा केले

  • नुकसान टाळण्यासाठी मृतदेह आणि त्यांचे अवशेष काळजीपूर्वक सीलबंद केले

  • अवशेष फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले

  • हाडे आणि ऊतींमधून डीएनए काढ

  • कुटुंबातील सदस्यांना रक्ताचे नमुने देण्यासाठी बीजे वैद्यकीय महाविद्यालयात बोलावले

  • डीएनए प्रोफाइलिंगसाठी रक्ताचे नमुने फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले

  • फॉरेन्सिक सायन्स संचालनालयात दात, ऊती इत्यादींमधून डीएनए काढले

  • जळालेली हाडे स्वच्छ करण्यात आली आणि हाडांतून डीएनए काढले

  • आरटी-पीसीआर आणि सिक्वेन्सिंग सारख्या प्रक्रियांद्वारे वेगवेगळे तपशीलवार डीएनए प्रोफाइल तयार केले

  • नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमधील तज्ज्ञ डॉक्टर पीडितांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे डीएनए ओळखण्यात व्यस्त आहेत.

  • आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, ओळखण्यासाठी अ‍ॅलील्स नावाच्या २३ प्रकारच्या अनुवांशिक घटकांची ओळख पटवणे आवश्यक आहे.

  • ओळख पटल्यानंतर, प्रियजनांचे अवशेष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुटुंबियांना सुपूर्द


सर्वात मोठी डीएनए जुळविण्याची मोहीम


विमान अपघातानंतर भारतात आतापर्यंतची देशातली सर्वात मोठी डीएनए जुळविण्याची मोहीम राबवण्यात आली. याआधी ओडिशा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ३० जणांचे डीएनए जुळविण्याची मोहीम २०२३ मध्ये झाली. तसेच राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत जीव गमावलेल्या २७ जणांची ओळख पटवण्यासाठी डीएनए जुळविण्याची मोहीम राबवण्यात आली. अहमदाबादमध्ये विमान अपघातानंतर मृतांची ओळख पटवून मृतदेह नातलगांना सुपूर्द करण्याचे काम पोलीस, प्रशासन, आरोग्य विभाग अशा अनेक यंत्रणांनी एकत्र काम करुन यशस्वी केले. गांधीनगरच्या फॉरेन्सिक सायन्स डायरेक्टरेट आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या टीम यांनी वेगाने आणि अचूक काम केले. घटनेनंतर लगेचच संपूर्ण ठिकाण सील करण्यात आले आणि मृतांचे ३०० हून अधिक नमुने गोळा करण्यात आले. तीन तासांत नमुने रुग्णालयांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, राजकोट, सुरत आणि वडोदरा या तीन फॉरेन्सिक सायन्स लॅबमधून डीएनए मॅचिंग किट आणि इतर उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांना तातडीने अहमदाबाद आणि गांधीनगरला पोहोचण्यास सांगण्यात आले.


विमान अपघातातील मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचे २५० हून अधिक नमुने घेण्यात आले. ३ फॉरेन्सिक लॅबमध्ये डीएनए काढण्याची आणि जुळवणी करण्याची व्यवस्था करण्यात आली. ओळख पटविण्यासाठी ४० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत होते. २०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी देखील त्यांना मदत करण्यासाठी कार्यरत होते. संपूर्ण टीम दिवसरात्र काम करत आहे. परिणामी, नमुना मिळाल्यापासून अवघ्या ३६ तासांत पहिल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. पहिल्या १०० तासांतच १६७ डीएनए जुळवण्यात आले. अवघ्या सात दिवसांत २१० मृतदेहांची ओळख पटवण्यात आली.

Comments
Add Comment