
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील गणपती मंदीरपासून काल बुधवारी पहाटे पन्नास महिला, पुरुष आणि मुले यांचा चमू पंढरपूर वारीसाठी सायकलने रवाना झाला आहे. हे सर्वजण २२ जुनपर्यंत पंढरपुरात वास्तव्य करणार असून तेथे विठोबा माऊलीचे दर्शन घेऊन तेथे येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणार आहेत.
पर्यावरण, आरोग्य, पर्यटन, देवदर्शन असे या सायकल वारीचे उद्देश आहेत. बहुसंख्य महिला असलेल्या या सायकल वारीत १५ वर्षांच्या मुलापासून ७८ वर्षांच्या महिला-पुरुषांपर्यंत समावेश आहे.
त्यांच्या सोबत बस, टेम्पो, रुग्णवाहिका असून त्यात पाणी बॉटल, औषधे, खाण्याचे पदार्थ इत्यादी घेतले आहे. याचा उपयोग वारकऱ्यांसाठी व सायकल वारीत सहभाग घेतलेल्यांसाठी होणार आहे. या वारीसाठी काही नागरिकांनी आपली मदत दिली आहे. पहाटे वारीला निघण्यापूर्वी भाजपाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी या वारीसाठी खास मदत केली असून त्यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा
दिल्या आहेत.