
पुणे : पुण्यात सकाळपासून पावसाची तुफानी सुरु आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खेड आणि नागोठणे या शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्यात गेले आहेत. यामुळे प्रचंड वाहतूक कोडींही झाली आहे. सिंहगड रोडवर पाणीच पाणी फ़ायतला मिळतंय.

लोकल ट्रेनमध्ये बॅगा घासून झालेल्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय मुंबई : रेल्वे सुरक्षा बल आणि लोकमार्ग पोलीस यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ...
सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी
सकाळपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पाणी घुसल्याचंही समोर आलं आहे. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वडगाव खुर्द इथल्या लालगड मळा वाहतूक सिग्नलवर खोदकाम सुरू आहे. खड्डा पाण्याखाली गेला असून इथं पाणी साचलं असल्यानं अपघाताची शक्यता आहे. धायरी सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी पूर्णपणे वाहतूक कोंडी झाली आहे. पुढचे २४ तास मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
रायगमध्ये नद्यांना पूर
रायगडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. खोपोली-वाकण वाहतूक ठप्प झाली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडलीय. अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आलं आहे. पोलिसांनी रस्त्यावर पाणी आलेल्या मार्गावरून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.
रायगड जिल्ह्यात शाळांना सुट्टी
हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आज प्रशासनाकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. खोपोली, पेण, रोहा या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांसह सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.