
माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज
अवंदा गर्दी हाय म्हणत्यात... पाऊस बक्कळ हाय बघा, पण पेरण्या रखडल्यात. असो, माउली बघून घेतील ओ..! चला माउलींच्या वारीला..!! असं म्हणत महाराष्ट्राच्या गावांगावातून वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आळंदी गाठलीय. वारकऱ्यांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेलीय. हातात पताका, गळ्यात टाळ आणि मुखी पाडुंरंगाचे नाम...असं चैतन्याची अनुभूती देणार वातावरण सध्या इथं अनुभवायला मिळतयं.
?si=94LpjkBb3Hd696xa
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा उद्या म्हणजे गुरुवारी रात्री ८.०० वाजता होत आहे. त्यामुळं या सोहळ्याच्या तयारीची लगबग आज आळंदीत पाहायला मिळतेय. प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम कसा असेल ते पाहूया...

मुंबई : महाराष्ट्र शासनाने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाला मनसे विरोध करणार असल्याचे राज ठाकरे यांनी ...
गुरूवारी पहाटे ४ ते ५.३० वाजता
घंटानाद, काकडा, पवमानाभिषेक, पंचामृतपूजा व दुधारती.
पहाटे ५ ते सकाळी ९ वाजता
भाविकांची माउलींच्या चलपादुकांवर महापूजा होईल
सकाळी ६ ते दुपारी १२ वाजता
भाविकांना समाधिस्पर्श दर्शन
सकाळी ९ ते ११ वाजता
वीणामंडपात कीर्तन होईल.
दुपारी १२ ते १२.३०
गाभारा स्वच्छता व माउलींना महानैवेद्य.
दुपारी १२ ते ५
भाविकांना समाधिस्पर्श दर्शन.गुरुवारची श्रींची नित्य पालखी प्रदक्षिणा
रात्री ८ वाजता
प्रस्थान सोहळा कार्यक्रम सुरू होईल. यात श्रीगुरू हैबतबाबा आरती, संस्थानतर्फे आरती, मानकऱ्यांना नारळप्रसाद, माउलींच्या पादुका पालखीत ठेवण्यात येतील. संस्थानतर्फे मानकऱ्यांना मानाच्या पागोट्यांचे वाटप, श्रीगुरू हैबतबाबातर्फे नारळप्रसाद, संस्थानतर्फे समाधीजवळ नारळप्रसादाचे वाटप होऊन पालखी वीणामंडपातून प्रस्थान ठेवत महाद्वारातून बाहेर पडते. प्रदक्षिणा घातल्यानंतर गांधीवाडा मंडप या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे.