पावसाळी अपघात टाळण्यासाठी रायगड पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

रायगड: माणगाव तालुक्यात पावसाळी पर्यटनस्थळांवर वाढत्या अपघातांची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाद्वारे पर्यटकांसाठी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. ज्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पावसाळ्यात सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण असलेले देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, ताम्हीणी घाट परिसरासह रायगड येथील इतर प्रसिद्ध पावसाळी पर्यटनस्थळांचा समावेश आहे.


पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार पर्यटकांनी धबधब्यांच्या परिसरात दारूचे सेवन करणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा रिल्स बनवणे, उधळपट्टी करणे अशा कृतींना पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.



सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक


पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य अनुभवताना सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून, पर्यटकांनी नियमांचे पालन करूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची