केदारनाथच्या मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू

  73

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ धामला जाणाऱ्या ट्रेक मार्गावर भूस्खलन झाले. भूस्खलन होऊन डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि मोठे दगड कोसळले. जंगलचट्टी घाटाजवळील डोंगराच्या माथ्यावरून दगड - मातीचा ढिगारा खाली आला. या ढिगाऱ्याखाली दबून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. अपघाताच्या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. याआधीही दोन दिवसांपूर्वी पावसामुळे केदारनाथ मार्गावर अपघात झाला होता.

केदारनाथ मार्गावर १८ जून रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी जंगलचट्टी गधेरेजवळ डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि दगड कोसळले. या अपघातात पाच लोक ढिगाऱ्याखाली आले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ जंगलचट्टी येथील पोलिसांनी आणि डीडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. मदतकार्य सुरू झाले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता आणि इतर तीन जण जखमी होते.

केदारनाथ भागात मोठा पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे मार्गावर अनेक ठिकाणी अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे