Israel-Iran War: खमेनेई यांच्या ठिकाणांवर इस्त्रायलचा जोरदार हल्ला, देशाला संबोधित केल्यानंतर झाला हल्ला

तेहरान: इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनेई यांनी देशाला संबोधित केले. लाईव्ह टीव्हीवर संबोधित केल्यानंतर काही मिनिटातच इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी तेहरानच्या लवीजन या भागात हल्ला केला. लवीजान हे खमेनेई यांच्या संभाव्य गुप्त ठिकाण मानले जाते. या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, खमेनेई या हल्ल्यात बळी तर नाही पडले अशी अटकळी बांधल्या जात आहेत.


इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खुलेपणे म्हटले होते की जर खमेनेई संपले तर युद्ध आणि इराणचे शासन दोन्ही संपून जातील. त्याचदरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे.


याआधी इराणी मीडियाने रिपोर्ट दिला होता की खमेनेई यांना तेहरानच्या उत्तर-पूर्व भाग लवीजानच्या एका भूमिगत बंकरमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्याचमुळे की काय इस्त्रायलने तो बंकरला लक्ष्य बनवले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, या हल्ल्यानंतर अद्याप ना इस्त्रायल अथवा इराण दोन्हीकडूनही कोणत्याही प्रकारे अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र या घटनेने दोन्ही देशातील सुरू असलेला तणाव तसेच युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर बनवली आहे.

Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने