
दुसरीकडे महत्वाच्या पाश्चिमात्य देशात कपड्यांची घटलेली मागणी, वाढता खर्च यामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊ शकतो. अखेरीस त्याचा अतिरिक्त भार ग्राहकांवर पडू शकतो. त्यामुळे एकंदर किंमतीत देखील वाढ होऊ शकते असे निरिक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. मात्र बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, व्हिएतनाम मधील कापड उद्योगांचे कोलमडलेले बजेट, वाढता मजूरी खर्च यामुळे तो बाजार भारतात अधिक सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक देखील होऊ शकते असे अहवालात म्हटले गेले आहे.
भारताकडे आता या क्षेत्रातील जागतिक दर्जाचे हब बनण्याची आयती संधी चालून आली आहे. याशिवाय अहवालाने हे देखील म्हटले आहे की,' व्हिएतनाम वाढत्या कामगार खर्चाशी झुंजत आहे, तर बांगलादेश राजकीय अस्थिरतेशी झुंजत आहे, त्यामुळे भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील स्पर्धात्मकतेत वाढ होऊ शकते '.
अहवालातील माहितीनुसार, टेक्स्टाईल क्षेत्राने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये चांगली कामगिरी केली होती. साधारणतः कापड कंपन्यांच्या वार्षिक महसूल (Annual Revenue) मध्ये वार्षिक बेसिसवर (YoY) ५% वाढ झाली होती तर करपूर्व नफा (EBITDA) ३ टक्क्याने घटला होता. करोत्तर नफा (Profit After Tax PAT) मध्ये ३% वार्षिक वाढ झाली होती. विशेषतः करोत्तर नफ्यात झालेली घट ही कमी झालेला बाजारातील वोल्युममुळे व आयात निर्यातील टेरिफ शुल्कातील चढउतार यामुळे झाली होती.
स्पिनिंग कंपनीच्या स्थूल मार्जिन (Gross Margin) मध्ये १०% वार्षिक वाढ झाली आहे मुख्यतः कॉटनच्या किंमती तिमाहीत २% घसरल्याने वाढ झाली. गारमेंट व्यवसायात तर मोठ्या प्रमाणात बाजाराने देशात पुनरागमन केले होते. इयर ऑन इयर बेसिस (YoU) , मध्ये १० टक्क्याने तर तिमाहीत निकालात १० टक्क्याने वाढ झाल्याचे देखील या अहवालात नमूद केले गेले आहे.
अहवालाच्या अंतिम निरीक्षणाप्रमाणे, स्थिर राहिलेल्या कॉटनच्या किंमती, परकीय चलनाचे समाधानकारक दर, व दैनंदिन कामकाजात वाढलेली उत्पादकता (Operational Efficiency) वाढल्याने हा सकारात्मक बदल टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये अपेक्षित आहे.