स्थानिकांना दिलासा ! संरक्षण भिंत पाडणार नाही; राज्य सरकारची हमी...

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) आणि रेडिओ क्लबदरम्यान प्रस्ताविक जेट्टीसाठी समुद्रलगत असणारी सरंक्षण भिंत ३० जूनपर्यंत पाडणार नाही. अशी हमी राज्य सरकारने स्थानिकांना दिली. त्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. कोणतेही अधिकृत परवानगी नसताना, जेट्टीचं काम सुरु करण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. त्यामुळे प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती..

मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सोमवारी पार पाडल्यामुळे राज्य सरकारने स्थानिकांच्या बाजूने दिलासादायक निर्णय घेतला आहे.  त्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. जेट्टीच्या प्रकल्पासाठी भिंत पाडण्यासाठी परवानगी देण्यात आली असती, तर नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले असते.

अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. मुळातच प्रकल्पासाठी भिंत का पाडण्यात येत आहे ?  असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. समुद्रलगत असणारी भिंत ७० वर्ष जुनी आहे. प्रास्ताविक जेट्टीचा प्रकल्प हा सार्वजनिक पायाभूत सुविधा उपक्रम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :