जी ७ परिषदेसाठी पंतप्रधान मोदी कॅनडातील कॅलगरी शहरात, जाणून घ्या कॅलगरीचे महत्त्व

कॅलगरी : जी ७ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील कॅलगरी शहरात पोहोचले आहेत. याआधी त्यांनी सायप्रसचा दौरा केला. कॅलगरीमध्ये होत असलेल्या जी ७ परिषदेत पंतप्रधान मोदी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित आहेत. परिषदेच्या निमित्ताने कॅनडा भारतासोबत निर्माण झालेला तणाव दूर करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. कॅनडात सक्रीय खलिस्तान समर्थकांचा मोदींच्या दौऱ्याला विरोध आहे. पण कॅनडा सरकारने या विरोधाला जुमानलेले नाही. कॅनडा सरकारच्या आमंत्रणाला स्वीकारत पंतप्रधान मोदी कॅनडातील कॅलगरी शहरात पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ की, काय आहे कॅलगरी शहराचे महत्त्व.



कॅलगरी शहराला कॅनडाची ऊर्जेची राजधानी असे म्हणतात. कारण कॅलगरी कॅनडातील ऊर्जा आणि पेट्रोलियम उद्योगाचे केंद्र आहे. टर्नर व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे सापडल्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच शहराचे महत्त्व वाढत गेले. शहराच्या मध्यभागी चमकदार गगनचुंबी इमारती आणि शहराच्या सीमावर्ती भागात असलेले पर्वत यामुळे हे शहर अनेकांना प्रिय आहे.

कॅलगरी शहराच्या लोकसंख्येमध्ये सुमारे ११ टक्के दक्षिण आशियाई नागरिक आहेत. यातही भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. भारतीयांव्यतिरिक्त या भागात पाकिस्तानी नागरिकही मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. व्यवसाय, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात भारतीय वंशाचे लोक महत्त्वाची भूमिका बजावतात.कॅलगरीत दरवर्षी जुलै महिन्यात दहा दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन करतात. याआधी १९८८ मध्ये कॅलगरीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक झाले होते. कॅनडाचे दुसरे सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय, ग्लेनबो संग्रहालय आणि सुंदर नैसर्गिक स्थळे कॅलगरीत आहेत.

कॅलगरीत झालेल्या २०२१ च्या जनगणनेनुसार, सुमारे १५ लाख नागरिक शहरात वास्तव्यास आहेत. हे कॅनडातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे आणि वेगाने वाढणाऱ्या महानगरीय प्रादेशिक लोकसंख्येसह आर्थिक आणि शहरी विकासाचे एक प्रमुख केंद्र आहे. कॅलगरीमध्ये राहण्याचा खर्च कॅनडातील टोरंटो किंवा व्हँकुव्हरसारख्या इतर मोठ्या शहरांपेक्षा कमी आहे. घर, वाहतूक आणि दैनंदिन खर्चासाठी सरासरी उत्पन्न प्रति तास २२ कॅनेडिअन डॉलर एवढे आहे.
Comments
Add Comment

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल

काँगोत भीषण दुर्घटना ! किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

दक्षिण आफ्रिका  : देश काँगोत पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली आहे. किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या