Tuesday, June 17, 2025

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज​ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थाना​साठी सज्ज

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज​ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थाना​साठी सज्ज

आळंदी : जगतगुरूश्री संत तुकाराम महाराज​ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यां​चा प्रस्थान​ सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. या अनुपम प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी पोलिस दल, प्रशासकीय यंत्रणांची सज्ज आहेत. आळंदी पोलिस ठाण्यानं यंदाच्या वारीत अधिकारी, कर्मचारी व विविध पोलिस पथके ​असं जवळपास २ हजार मनुष्यबळ​ तैनात केलयं. ​


​आषाढी वारीला सुरुवात झालीय. विठूरायाच्या भेटीची आस असलेले वारकरी ज्ञानबा-तुकाराम​चा गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं देहू आणि आळंदी इथं ​दाखल होताहेत. ​​बुधवारी ​ ​जगतगुरू​ श्री संत तुकाराम महारा​जांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे.


प्रस्थान सोहळा याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांच्या गर्दीनं देहूनगरी फुललीय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी​ आलेल्या वारकरी-भाविकां​साठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ​



देहू नगरपंचाय​तीनं मुख्य मंदिर व परिसर, इंद्रायणी घाट, वैकुंठस्थान मंदिर, पीएमपी बसस्टॉप, देहूतील मुख्य रस्ते, अनगडशहा बाबा दर्गा, पाण्याचे टँकर उपलब्ध असणारी ठिकाणे, उपचार केंद्र, पोलिस मदत केंद्र आदी ४२ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेत.​ यातून संपूर्ण पालखी सोहळ्यावर बारीक नजर ठेवण्यात येणारेय. तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पाल​खी प्रस्थान सोहळा होणार असल्यानं आळंदीमध्येही दिंड्या मोठ्या संख्येने दाखल होताहेत. प्रस्थान सोहळा कालावधीत २०​ जूनपर्यंत आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. ​यामुळं आजपासून​ शहरात वाहनांना प्रवेश बंदी ​घातली आहे.केवळ दिंड्यांच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यावर यंदा अतिपावसाचे सावट आहे.​ माउली मंदिर आणि संपूर्ण आळंदीचा ​प्रस्थान सोहळा हा इंद्रायणी नदी घाटाभोवती पार पडत असतो. या काळात इंद्रायणी नदी घाटावर अनेक वारकरी जमा होतात. प्रस्थान सोहळा अवघ्या​ दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. ​स​हा दिवसांपूर्वीच इंद्रायणीची पाणीपातळी चांगलीच वाढलीय. ​चार दिवसांपासून इंद्रायणी नदीपात्र परिसरात मावळपासून आळंदीपर्यंत ​पाऊस सुरू आहे.​ हवामान विभागानंही आगामी ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा दिलाय. त्यामु​ळं या सोहळ्यासाठी हवामानाचा अंदाज लावून नदीच्या पाणीपातळीचा विचार करत प्रशासनाला अधिक सतर्क रहाव​ं लागणार ​आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा