वृद्ध वडिलांनी मुलाला आणि सैन्यात असलेल्या पत्नीने पतीला दिला अखेरचा निरोप, दोन वैमानिक अनंतात विलीन

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात दोन मोठे अपघात झाले. एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान कोसळले. या अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. फक्त 11A या आसनावरील प्रवासी वाचला. काही दिवसांच्या अंतराने उत्तराखंडमध्ये केदारनाथच्या दिशेने भाविकांना घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकासह हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला. या दोन दुर्घटनांमुळे भारताने दोन गुणी वैमानिक (पायलट) गमावले. दोन्ही वैमानिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.





मुंबईत एअर इंडियाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना त्यांच्या वृद्ध वडिलांनी पुष्करराज यांनी पवईच्या घरी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. ज्या वयात मुलाचा आधार घेऊन जगावे असे वाटते त्या वयात मुलाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ पुष्करराज यांच्यावर आली. बराच वेळ पुष्करराज हात जोडून शांत उभे होते. अखेर त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. ते रडण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. मुंबईत असे शोकाकूल वातावरण असताना जयपूरमध्ये लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान त्यांचे पती, लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंग चौहान (निवृत्त) यांना साश्रूपूर्ण नयनांनी निरोप देत होत्या. राजवीर सिंग हे १५ जून रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे पायलट होते.

मुंबईत झाले अंत्यसंस्कार

कॅप्टन सुमित सभरवाल यांचे पार्थिव एका शवपेटीत ठेवण्यात आले आणि सकाळी विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. कुटुंबीयांनी कॅप्टन सभरवाल यांचे पार्थिव पवई येथील जल वायु विहार येथील त्यांच्या निवासस्थानी नेले. त्यांचे पार्थिव तासभर घरी ठेवण्यात आले नंतर चकाला येथे विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुळ्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी लेफ्टनंट कर्नलवर येऊन पडली

रविवारी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले जयपूरचे रहिवासी पायलट राजवीर सिंग चौहान यांनी भारतीय सैन्यात १५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आणि विविध भूप्रदेशांमध्ये उड्डाण मोहिमांचा त्यांना व्यापक अनुभव होता. रविवारी केदारनाथजवळ एका खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आणि पायलट चौहानसह सात जणांचा मृत्यू झाला. आता राजवीर यांच्या पत्नी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांच्यावर एकटीने जुळ्या मुलांचे संगोपन करण्याची वेळ आली आहे. चारच महिन्यांपूर्वी चौहान दांपत्याला जुळी मुले झाली होती.

 
Comments
Add Comment

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६