माणगावमध्ये लोकवस्तीनजीक आढळून आले मगरीचे घरटे

वनविभागामार्फत त्वरित घरट्याला देण्यात आले संरक्षण


माणगाव : माणगांव तालुक्यात काळ नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे, काळ नदीकिनारी त्यांना मुबलक नैसर्गिक अधिवास आहे, माणगांव शहर हे पूर्वी छोटे गाव होते त्याची आता व्याप्ती वाढलेली आहे त्यामुळे जवळील वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांवर परिणाम होत असल्याचा दिसून येत आहे, परिणामतः हे वन्यजीव व ह्या मगरी शहरामध्ये मानववस्तीनजीक दिसून येत आहेत, गेल्यावर्षीदेखील शहराच्या मध्यभागातुन मोठ्या मगरीला रेस्क्यू करण्यात आलेले होते.



खांदाड गावात सोनभैरव मंदिर परिसरात काळ नदीकिनारी एका मगरीचे घरटे आढळून आले आहे, येथे मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत, खबरदारी म्हणून माणगांव वनविभागाने तत्परतेने त्वरित योग्य ती कारवाई करून ह्या मगरीचे घरटे येथे सुरक्षित केले आहे जेणेकरून ह्या मगरीला व तिच्या पिल्लांना कोणतीही इजा पोहोचणार नाही, व मोठ्या मगरीपासून पिल्लांच्या बचावाकरिता देखील, कोणत्याही नागरिकांवर मगरीच्या हल्ला होणार नाही व कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, सदरचा परिसर वनविभागाकडून त्वरित निषिद्ध करण्यात आला आहे. सदरचे मगरीचे घरटे सुरक्षित करण्याकरिता माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, व वनपाल ज्ञानदेव सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पवन चौधरी व वनमजूर गणेश शिर्के, सुनिल तोंडलेकर, अनिल पवार, रुपेश हिलम व बाळू जाधव यांनी योग्य ती कार्यवाही केली आहे.


सद्याच्या पावसाच्या दिवसांमध्ये आता ह्या मगरी नदीला येत असणाऱ्या मोठ्या पुरामुळे प्रवाहात वरती छोट्या ओढ्यामध्ये व शेतांमध्ये घुसण्याची शक्यता असते, त्यामुळे नदीकिनारील नागरिकांनी भयभीत न होता तसेच मगर पाहण्यासाठी गर्दी ना करता, मगरींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता वनविभागाकडे किंवा स्थानिक बचावपथकांकडे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्याकडून करण्यात आले आहे.


नदीकिनारील नागरिकांनी पावसाळ्यात खबरदारी घ्यावी, पूरपरिस्थितींमुळे, मगरी-साप तसेच इतर वन्यजीव मानववस्तीनजीक आसरा घेण्यासाठी येऊ शकतात, नागरिकांना खबरदारी घेऊन त्वरित वनविभागाकडे संपर्क साधावा, वनविभाग वन्यजीव व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.

Comments
Add Comment

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या

अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-शेकाप लढत

१४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात अलिबाग : अलिबाग पंचायत समिती निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत.

राजिप, पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर पोलीस यंत्रणा सज्ज

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने

करंजाडी जिप गटात तिरंगी लढत

महाड ( वार्ताहर): महाड विधानसभा मतदारसंघ हा गेल्या ४ टर्म शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. गतवेळच्या निवडणुकीत