माणगावमध्ये लोकवस्तीनजीक आढळून आले मगरीचे घरटे

  19

वनविभागामार्फत त्वरित घरट्याला देण्यात आले संरक्षण


माणगाव : माणगांव तालुक्यात काळ नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे, काळ नदीकिनारी त्यांना मुबलक नैसर्गिक अधिवास आहे, माणगांव शहर हे पूर्वी छोटे गाव होते त्याची आता व्याप्ती वाढलेली आहे त्यामुळे जवळील वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांवर परिणाम होत असल्याचा दिसून येत आहे, परिणामतः हे वन्यजीव व ह्या मगरी शहरामध्ये मानववस्तीनजीक दिसून येत आहेत, गेल्यावर्षीदेखील शहराच्या मध्यभागातुन मोठ्या मगरीला रेस्क्यू करण्यात आलेले होते.



खांदाड गावात सोनभैरव मंदिर परिसरात काळ नदीकिनारी एका मगरीचे घरटे आढळून आले आहे, येथे मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत, खबरदारी म्हणून माणगांव वनविभागाने तत्परतेने त्वरित योग्य ती कारवाई करून ह्या मगरीचे घरटे येथे सुरक्षित केले आहे जेणेकरून ह्या मगरीला व तिच्या पिल्लांना कोणतीही इजा पोहोचणार नाही, व मोठ्या मगरीपासून पिल्लांच्या बचावाकरिता देखील, कोणत्याही नागरिकांवर मगरीच्या हल्ला होणार नाही व कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, सदरचा परिसर वनविभागाकडून त्वरित निषिद्ध करण्यात आला आहे. सदरचे मगरीचे घरटे सुरक्षित करण्याकरिता माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, व वनपाल ज्ञानदेव सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पवन चौधरी व वनमजूर गणेश शिर्के, सुनिल तोंडलेकर, अनिल पवार, रुपेश हिलम व बाळू जाधव यांनी योग्य ती कार्यवाही केली आहे.


सद्याच्या पावसाच्या दिवसांमध्ये आता ह्या मगरी नदीला येत असणाऱ्या मोठ्या पुरामुळे प्रवाहात वरती छोट्या ओढ्यामध्ये व शेतांमध्ये घुसण्याची शक्यता असते, त्यामुळे नदीकिनारील नागरिकांनी भयभीत न होता तसेच मगर पाहण्यासाठी गर्दी ना करता, मगरींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता वनविभागाकडे किंवा स्थानिक बचावपथकांकडे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्याकडून करण्यात आले आहे.


नदीकिनारील नागरिकांनी पावसाळ्यात खबरदारी घ्यावी, पूरपरिस्थितींमुळे, मगरी-साप तसेच इतर वन्यजीव मानववस्तीनजीक आसरा घेण्यासाठी येऊ शकतात, नागरिकांना खबरदारी घेऊन त्वरित वनविभागाकडे संपर्क साधावा, वनविभाग वन्यजीव व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.

Comments
Add Comment

चिमुकल्या प्रीत ने वाचवले दयाळ पक्ष्याच्या पिल्लांचे प्राण.

दोऱ्यामध्ये अडकलेल्या दोन पिल्लांची केली मुक्तता माणगाव : माणगांव येथील विकास कॉलनी परिसरात राहत असलेल्या गणेश

बापरे! चालत्या बसचं टायरच आलं बाहेर, थोडक्यात बचावले प्रवासी

बोरिवली-मुरुड एसटी बसचं टायर धावत्या बसमधून आलं बाहेर  महाड : सध्या ठीकठीकाणांहून अपघाताच्या बातम्याच जास्त

कर्जतचे भूमिपुत्र केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकाचे मानकरी

कर्जत :पोलीस विभागातील कर्जतचे पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल या

रायगड जिल्ह्यात अकरावी प्रवेशप्रक्रियेचा गोंधळ संपेना

पोर्टल बंद झाल्यानंतर ऑफलाईन प्रक्रियेवर आशा कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अडवणूक अलिबाग :अकरावी प्रवेशासाठी

उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार?

महापालिकेच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त पनवेल  : उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईकडे पालिका

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये नगरपालिकांच्या निवडणुका

राज्य सरकारकडून प्रभाग रचनेचे आदेश अलिबाग : निवडणूक अयोगाने दिलेल्या आदेशानुसार पनवेल महापालिकेसह अलिबाग, पेण,