उत्तरप्रदेश : फटाका कारखाना स्फोटात ५ महिलांचा मृत्यू

अमरोहा : उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये ५ महिलांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पुढे आलीय.


अमरोहा येथील त्रासी गावापासून २ किलोमीटर अंतरावर जंगलात फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. कारखान्यात सुमारे २५ पुरुष आणि महिला काम करत होते. यादरम्यान, एका कामगाराच्या मुलाने फटाके पेटवले. त्यानंतर, जवळच ठेवलेले फटाके आणि गनपावडरला आग लागली. सुमारे १५ मिनिटे हे स्फोट सुरू राहिले.


स्फोटानंतर कारखान्याचा ढिगारा 300 मीटरपर्यंत पसरला. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. स्फोटाचा आवाज आणि धुराचे लोट ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथके घटनास्थळी पोहोचली. ढिगाऱ्याखाली गाडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी काम सुरू झाले. जिल्हाधिकारी निधी गुप्ता आणि एसपी अमित कुमार आनंद घटनास्थळी पोहचल्यात.

Comments
Add Comment

Air India Plane : एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) च्या विमानासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे

Indian Passport : पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी; MEA ने नागरिकत्वाबाबत दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel)

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.