School Reopens: महापालिकेच्या शाळा आजपासून सुरू

आयुक्त भूषण गगराणी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा आजपासून पासून सुरू होत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी बोरिवली (पश्चिम) येथील पोईसर महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. उन्हाळी सुट्टी संपून सोमवार, १६ जूनपासून सर्व शाळा सुरू होत आहेत.


मुंबई महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळाही सोमवारपासून सुरू होत आहेत. शाळेत पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बोरिवली येथील शाळेत पालिका आयुक्त भूषण गगराणी हे स्वतः उपस्थित राहून विद्याथ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचबरोबर बंदा शाळेच्या पहिल्याच दिवशीच महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे. पोयसर महापालिका शाळेत गगराणी यांच्या हस्ते विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.


मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी, तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी २००७-८ या शैक्षणिक वर्षापासून मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र अनेकवेळा शालोपयोगी साहित्याच्या खरेदीला विलंब झाल्यामुळे निम्मे वर्ष उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना या वस्तू मिळत नव्हत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाने नियोजन करून खरेदीचे वेळापत्रक जुळवून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वस्तू मिळतील याकरीता प्रयत्न केले.


महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा एप्रिल महिन्यातच शालोपयोगी साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालोपयोगी साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दप्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टेंबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला