School Reopens: महापालिकेच्या शाळा आजपासून सुरू

आयुक्त भूषण गगराणी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा आजपासून पासून सुरू होत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी बोरिवली (पश्चिम) येथील पोईसर महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. उन्हाळी सुट्टी संपून सोमवार, १६ जूनपासून सर्व शाळा सुरू होत आहेत.


मुंबई महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळाही सोमवारपासून सुरू होत आहेत. शाळेत पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बोरिवली येथील शाळेत पालिका आयुक्त भूषण गगराणी हे स्वतः उपस्थित राहून विद्याथ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचबरोबर बंदा शाळेच्या पहिल्याच दिवशीच महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे. पोयसर महापालिका शाळेत गगराणी यांच्या हस्ते विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.


मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी, तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी २००७-८ या शैक्षणिक वर्षापासून मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र अनेकवेळा शालोपयोगी साहित्याच्या खरेदीला विलंब झाल्यामुळे निम्मे वर्ष उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना या वस्तू मिळत नव्हत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाने नियोजन करून खरेदीचे वेळापत्रक जुळवून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वस्तू मिळतील याकरीता प्रयत्न केले.


महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा एप्रिल महिन्यातच शालोपयोगी साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालोपयोगी साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दप्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टेंबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन; सेन्सेक्स १,१८६.७७ अंकांनी वधारला

बाजारातील मजबूत परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसात ९.८२ लाख कोटी रुपये कमावले नवी दिल्ली : पश्चिम आशिया

Rejuvenation of rivers : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य

आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी' मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस

Land surveyors : भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती

मुंबई : राज्यातील भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Navsari : नवसारी येथे असलेल्या उभारणार भव्य क्रीडा संकुल

मुंबई : अमरावती शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज

जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग, अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ - कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

मुघल, इंग्रज आणि तत्कालीन काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा नीतीमुळेच हिंदू विभागले : मंत्री लोढा यांचा