School Reopens: महापालिकेच्या शाळा आजपासून सुरू

  42

आयुक्त भूषण गगराणी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा आजपासून पासून सुरू होत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी बोरिवली (पश्चिम) येथील पोईसर महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. उन्हाळी सुट्टी संपून सोमवार, १६ जूनपासून सर्व शाळा सुरू होत आहेत.


मुंबई महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळाही सोमवारपासून सुरू होत आहेत. शाळेत पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बोरिवली येथील शाळेत पालिका आयुक्त भूषण गगराणी हे स्वतः उपस्थित राहून विद्याथ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचबरोबर बंदा शाळेच्या पहिल्याच दिवशीच महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे. पोयसर महापालिका शाळेत गगराणी यांच्या हस्ते विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.


मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी, तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी २००७-८ या शैक्षणिक वर्षापासून मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र अनेकवेळा शालोपयोगी साहित्याच्या खरेदीला विलंब झाल्यामुळे निम्मे वर्ष उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना या वस्तू मिळत नव्हत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाने नियोजन करून खरेदीचे वेळापत्रक जुळवून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वस्तू मिळतील याकरीता प्रयत्न केले.


महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा एप्रिल महिन्यातच शालोपयोगी साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालोपयोगी साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दप्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टेंबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, अंधेरी सब वे पाण्याखाली

मुंबईसह कोकणात धुमाकूळ! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत मुंबई: उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला एअर इंडिया विमानाच्या प्रवासाचा अनुभव

मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाला.या घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त

BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस ५ फूट खोल खड्ड्यात गेली अन्…

मुंबई : मुंबईमधून गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गिरगाव येथील मेट्रो स्टेशनजवळ

मेट्रो ९ चा दहिसर, काशिगाव पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सेवेत

मुंबई : दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यानच्या मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक ९ प्रकल्पाने एक महत्त्वपूर्ण टप्पा

मनपा कार्यालयात विजेचा अनावश्यक वापर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने विजेची बचत करण्याचे आवाहन सर्वांना करण्यात येत असून

बोरिवली ते ठाणे भुयारी रस्ता प्रकल्प पुनर्वसनाला गती

एमएमआरडीएकडून तीन पर्यायांची घोषणा मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाणे