
इराण आणि इस्रायल यांच्यात सध्या भीषण संघर्ष सुरू आहे आणि त्याची किंमत भारताला मोजावी लागणार आहे. त्याची किंमत न भूतो न भविष्यती अशी आहे. इस्रायलने इराणच्या आण्विक स्थळांवर तसेच त्यांच्या युरेनियम समृद्ध तळांवर हल्ले केले आणि त्यामुळे इराणला फार मोठे नुकसान सोसावे लागले.
इराणचे लष्करी अधिकारी जे सर्वोच्च आहेत तेही या कारवाईत ठार झाले. इराणने इस्रायलवर हल्ले केले, पण त्यांची व्याप्ती इस्त्रायलच्या तुलनेत काहीच नव्हती. परिणामी भारताला आता नव्या पश्चिम आशियातील युद्धबिंदूला सामोरे जावे लागणार आहे. डावपेचात्मक वर्तुळात इस्त्रायलच्या या चालीचा खूप दिवसांपूर्वीपासून अंदाज व्यक्त केला जात होता. पण आता ती चाल रचली गेली आहे आणि त्याची किंमत इराणला मोजावी लागत आहे. तसेच जगालाही मोजावी लागणार आहे. ही अशी घटना आहे, की जिचे नवी दिल्लीत स्वागत केले जाणार नाही. कारण इस्त्रायल आणि इराण हे दोन्हीही देश भारताचे मित्र देश आहेत.
इराणबरोबर तर भारताचे पूर्वापार मैत्री पूर्ण संबंध आहेत, तर इस्रायलने भारताला पाकिस्तानसोबत नुकत्याच झालेल्या संघर्षात चांगली साथ दिली आहे. त्यामुळे भारतासमोर असा पेच आहे की कुणाचीही बाजू घेता येत नाही. तरीही भारताला आपले अलिप्तता वादाचे धोरण समोर ठेवून या संघर्षात भूमिका घ्यावी लागणार आहे.
इराणचा निर्णायक पराभव झाला अथवा त्याच्या अगदी जवळचे म्हणजे इराण कोसळले तरीही भारतात त्याचे फार मोठे परिणाम होणार आहे. मग भारताला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. भारताने आपली ऊर्जा सुरक्षा उभी केली आहे ती इराणसारख्या मित्र देशांच्या भरवशावर. इराण कोसळला, तर भारताला ऊर्जेचा पुरवठा होणार नाही आणि मग भारताला पुन्हा पूर्ववत पश्चिमी देशांकडे पाहावे लागेल. ते शक्य नाही कारण पश्चिमी देश आज जरी भारताचे मित्र असले तरीही बदलत्या परिस्थितीत भारताची साथ देतीलच असे नाही.
सर्वात भयंकर तडाखा भारताला बसेल तो क्रूड ऑईल आयातीवर. सध्या भारताची क्रूड तेलाची आयात इराणद्वारेच होते आणि ती केली जाते होर्मुझच्या बंदरातून. त्या प्रदेशात कुठेही युद्ध सुरू झाले की ती युद्धभूमी होते आणि त्यामुळे भारताच्या क्रूड तेलाच्या किमती १५० प्रति बॅरल इतक्या चढू शकतात. त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या की, देशांतर्गत महागाई वाढते आणि व्यापारी असमतोल निर्माण होतो.
चलनाचा दबाव वाढतो आणि फिस्कल डेफिसिटमध्ये तीव्र स्वरूपाचा चढ होतो. भारताची अर्थव्यवस्था अगोदरच टाईट मार्जिन्समधून हेलकावे खात आहे. तिला हा मोठा फटका बसेल. तेलाशिवाय भारताची डावपेचात्मक भूराजकीय स्थितीशी तडजोड केली जाईल. इराणचे चाबाहर बंदर जे भारताने विकसित केले आहे आणि ते पाकिस्तानला उत्तर म्हणून काम करत आहे ते या युद्धात एक तर बंद होईल किंवा काम करणे सोडून दिले जाईल आणि त्याबरोबरच भारताकडे असलेला एकमेव उपलब्ध दक्षिण उत्तर मार्ग म्हणजे मध्य आशिया आणि रशिया यांच्याकडे जाण्याचा व्यापारी मार्गही बंद होईल. हे नुकसान प्रचंड असेल. कारण हा मार्ग पाकिस्तान आणि चीनमधून जातो.
शिवाय यामुळे काश्मीर आणि त्या पलीकडे दहशतवादाचा धोकाही अतोनात वाढेल. हा सर्व विचार करता भारताने इराण किंवा इस्त्रायल यांपैकी कुणाचीही बाजू न घेताच युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. राजनैतिकदृष्ट्याही याचे तोटे अनेक आहेत. कारण भारताने जर इराणची बाजू घेतली, तर इराणसारखा मित्र देश गमावेल आणि त्याचा फटका भारताला बसेल. कारण इराण हा भारताचा इंटलिजन्स शेअरिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे. तो लाभ भारताला गमवावा लागेल. या सर्व तोट्याबरोबरच भारताला एक फार मोठ्या शत्रूला तोंड द्यावे लागणार आहे. ते म्हणजे चीनचा या प्रदेशात शिरकाव होईल. चीनच्या इराणीयन डावपेचात्मक ठिकाणांमध्ये प्रवेश केल्याने पाकिस्तानला सहज प्रवेश मिळू शकेल आणि पाकच्या गुप्तचर संस्थांची क्षमता या भारताच्या धोकादायकरीत्या जवळ आहे आणि त्यामुळे भारतासाठी इराणचे कोसळणे हे एखाद्या देशाचे कोसळणे नसेल, तर पाश्चिमात्य प्रदेशाकडे जाणारा रस्ताच बंद होईल.
इराण जर या युद्धात पराभूत झाला, तर भारतालाही मोठा फटका बसेल कारण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा गेली अनेक दशके जे भारताचे परदेशी धोरण ठरवत आहे आणि भारताचा झेंडा उंच ठेवत आहे तेच कोसळेल.
इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षाचा तात्कालिक परिणाम म्हणजे भारतातील तेलाच्या किमती ४० ते ५० टक्क्यांनी वाढतील. त्यामुळे भारतातील महागाई एकूणच प्रचंड वाढेल आणि भारताची ८० टक्के गरज ही आयातीतून भागवली जात असल्याने याचा फटका किती प्रमाणात बसेल याचा विचारच न केलेला बरा. सध्याच्या युद्धामुळेच जागतिक तेलाच्या किमती ८ टक्क्यांनी वाढल्या आणि अशी भीती पसरली आहे की हे युद्ध असेच सुरू राहिले, तर महागाई आणखी वाढेल.
सध्याच्या इराण-इस्त्रायल संघर्षामुळे अनेक प्रश्न भारतासमोर निर्माण होणार आहेत. जरी भारत इराणकडून थेट पेट्रोल आयात करत नाही तरीही भारताच्या क्रूड तेलाच्या किमतींचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे कारण जागतिक तेलाच्या किमती आज अर्थव्यवस्था ठरवतात. शिवाय २० टक्के तेल हे होर्मुझच्या खाडीतून येते. त्यामुळे तेथे युद्ध झाले, तर होर्मुझचा रस्ता बंद होऊन भारताला तेल केप ऑफ गुड होपला वळसा घालून आयात करावे लागेल, त्यामुळे आयात तेलाची किंमत किती वाढेल याची कल्पना येण्यासारखी आहे.
या क्षेत्रात व्यत्यय आला, तर त्याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर होणार आहे. अगोदरच भारताची निर्यात कमी आहे. त्यात हा खर्च वाढला तर भारताची अर्थव्यवस्था बसू शकते. त्यामुळे भारतासमोर सध्या एकच पर्याय आहे तो म्हणजे इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी युद्ध थांबवावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या युद्धात कुणा एकाची बाजू घेतली, तर भारताला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल.