मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा मान्सून आधीच दाखल झाल्याने पाणीकपात नाही, म्हणून मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता, मात्र तलाव क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.


पाऊस अजून लांबल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. शिल्लक साठा व पावसाचा अंदाज घेत यावर्षी मुंबई महापालिकेने पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावातील पाणीपातळी घटल्यामुळे राखीव पाणी साठ्यातून मुंबईत पाणी आणण्यात येणार आहे.


यातून मुंबईकरांची तहान भागणार असली तरी फार काळ राखीव कोट्यातील पाणीसाठा वापरणे शक्य नाही. येणाऱ्या आठवडाभरात तलाव क्षेत्रात पाऊस दाखल झाला, तर ठीक अन्यथा सध्याचा पाणीसाठा मुंबईकरांना अजून महिनाभर पुरवण्यासाती मुंबई महापालिकेसमोर पाणीकपात करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

Comments
Add Comment

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना