मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा मान्सून आधीच दाखल झाल्याने पाणीकपात नाही, म्हणून मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता, मात्र तलाव क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.


पाऊस अजून लांबल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. शिल्लक साठा व पावसाचा अंदाज घेत यावर्षी मुंबई महापालिकेने पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावातील पाणीपातळी घटल्यामुळे राखीव पाणी साठ्यातून मुंबईत पाणी आणण्यात येणार आहे.


यातून मुंबईकरांची तहान भागणार असली तरी फार काळ राखीव कोट्यातील पाणीसाठा वापरणे शक्य नाही. येणाऱ्या आठवडाभरात तलाव क्षेत्रात पाऊस दाखल झाला, तर ठीक अन्यथा सध्याचा पाणीसाठा मुंबईकरांना अजून महिनाभर पुरवण्यासाती मुंबई महापालिकेसमोर पाणीकपात करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

Comments
Add Comment

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व