मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

  38

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा मान्सून आधीच दाखल झाल्याने पाणीकपात नाही, म्हणून मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता, मात्र तलाव क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.


पाऊस अजून लांबल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. शिल्लक साठा व पावसाचा अंदाज घेत यावर्षी मुंबई महापालिकेने पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावातील पाणीपातळी घटल्यामुळे राखीव पाणी साठ्यातून मुंबईत पाणी आणण्यात येणार आहे.


यातून मुंबईकरांची तहान भागणार असली तरी फार काळ राखीव कोट्यातील पाणीसाठा वापरणे शक्य नाही. येणाऱ्या आठवडाभरात तलाव क्षेत्रात पाऊस दाखल झाला, तर ठीक अन्यथा सध्याचा पाणीसाठा मुंबईकरांना अजून महिनाभर पुरवण्यासाती मुंबई महापालिकेसमोर पाणीकपात करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

Comments
Add Comment

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन दिसल्यास कारवाईचे निर्देश

शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची प्रक्रिया, शिजवणे वेगळी असावी मुंबई : अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत,

मुंबईतील अमेरिकन महावाणिज्य दूतावास कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई : मुंबईतील अमेरिकन महावाणिज्य दूतावास कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही माहिती मिळताच

महापालिका शाळेत आता गुरुवार गणिताचा

मुंबई : ’मिशन मेरिट’ उपक्रम अंतर्गत मुंबई महानगरपालिका व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने

पदपथावरील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करणे अपेक्षित

कांदिवली : मालाड पश्चिमेला जन कल्याण नगर मुख्य मार्गांवरील पद पथावर अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे.

परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री

पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न मुंबई : भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील

ऐरोली सिलिंडर स्फोटानंतर मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

मुंबई (खास प्रतिनिधी): ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील सिलिंडर स्फोटाच्या दुघर्टनेनंतर दादर, वडाळा रेल्वे स्थानक