Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत थोडक्यात बचावली अकोल्याची ऐश्वर्या

अकोला: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हे विमान एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवरही कोसळल यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मात्र अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल ही विद्यार्थिनी प्रसंगावधान राखत या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. मृत्यू तिने जवळून पहिला. पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’ हे ऐश्वर्याने तिच्यावर बेतलेल्या दुर्दैवी प्रसंगातून प्रत्यक्ष अनुभवले.


अकोल्यातील दुर्गा चौक येथील रहिवासी ऐश्वर्या तोष्णीवाल ही वसतिगृहाच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपली होती तेव्हा हा अपघात झाला.  या भयानक घटनेबद्दल बोलताना ऐश्वर्याने सांगितले की, "हा माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव होता, जो मी कधीही विसरणार नाही." तिने पाचव्या मजल्यावरील धुरातून स्वतःला बाहेर काढून आणि स्वतःभोवती ब्लँकेट गुंडाळून आपला जीव वाचवला.  अचानक, मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धूर पसरला. तरीही, दाट धुरातून मार्ग काढत ऐश्वर्या पाचव्या मजल्यावरून खाली उतरत आली. 


ऐश्वर्याने बिल्डिंगच्या खाली असलेल्या 6 फूट उंच भिंती ओलांडून बाहेर पडण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. मात्र तिचे  प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु मुळातच जिद्दी ऐश्वर्याने हार मानली नाही. परत प्रयत्न केला आणि ती चौथ्यांदा यशस्वी झाली. बिल्डिंगच्या बाहेर येताच तीने एक ऑटोरिक्षा थांबवून स्वतः रुग्णालयात गेली. या दुर्घटनेत ऐश्वर्या किरकोळ जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा संपूर्ण थरारक ऐश्वर्याचे वडिल अमोल तोष्णीवाल यांनी कथन केला.


अकोल्यातील तोष्णीवालच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, "ऐश्वर्या अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये डीएम ऑन्कोपॅथॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ती तिच्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. झोपेत असताना अचानक मोठ्या आवाजाने तिला जाग आली." "जेव्हा ती जागी झाली तेव्हा सर्वत्र धूर होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऐश्वर्याने स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळले आणि अंधार आणि धुरातून मार्ग शोधून पाचव्या मजल्यावरून खाली उतरून तिचा जीव वाचवला. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायांवर जळण्याच्या खुणा होत्या," असे कुटुंबातील सदस्याने सांगितले.


घाबरलेल्या ऐश्वर्याने ताबडतोब तिचे वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन केला, जे त्यावेळी अकोल्यातील दुर्गा चौकात त्यांच्या साडीच्या दुकानात होते. मुलीचा फोन येताच त्यांना धक्का बसला आणि ते दुकान बंद करून लगेच घरी गेले. अमोल तोष्णीवाल म्हणाले, "टीव्हीवर बातम्या पाहिल्यावर आम्हाला धक्का बसला. पण देवाच्या कृपेने आमची मुलगी इतक्या मोठ्या अपघातातून वाचली." ऐश्वर्याची आई माधुरी तोष्णीवाल आणि तिच्या आजी-आजोबांनी अश्रू ढाळत देवाचे आभार मानले. आजोबा म्हणाले, "आमची नात माझ्या वाढदिवसासाठी आली होती, पण तिला अशा अपघाताला सामोरे जावे लागले. ती सुरक्षित आहे याबद्दल मी देवाचे शंभर वेळा आभार मानतो." अपघातात जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल धक्का बसलेल्या तोष्णीवाल कुटुंबाने शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर