हृदयविकाराने नव्हे तर मधमाशी तोंडात गेल्याने झाला संजय कपूर यांचा मृत्यू, कंगणाने केला खुलासा

नवी दिल्ली: बॉलीवूड क्वीन आणि भाजपची खासदार कंगना राणौतने इंस्टाग्रामवर करिश्मा कपूरचे  माजी पती संजय कपूरच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. मात्र तिची पोस्ट केवळ श्रद्धांजली व्यक्त करणारी नव्हे तर, संजय कपूर यांच्या निधनाचे खरे कारण देखील उघड करणारी आहे.  ज्यामध्ये तिने लिहिले - 'आणखी एक अविश्वसनीय घटना घडली आहे. संजय कपूर (करिश्मा कपूरचा माजी पती) पोलो ग्राउंडवर खेळत होते. अचानक त्याच्या तोंडात एक मधमाशी गेली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.'


बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त काल प्रसारमध्यमांत झळकले. त्यानुसार, पोलो ग्राउंडवर संजय यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले गेले. पण त्यांच्या मृत्यूचे कारण श्वासनलिकेत मधमाशी अडकणे आहे. हा कंगना राणौतचा दावा आहे.


कंगना राणौतने इन्स्टाग्रामवर संजय कपूरच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना लिहिलेली ही पोस्ट सर्वांना बुचकळ्यात पाडते आहे. 



कंगणाची पोस्ट व्हायरल


ज्यात तिने म्हंटले आहे की, संजय कपूर (करिश्मा कपूरचा माजी पती) पोलो ग्राउंडवर खेळत होते. अचानक एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली. पोलो ग्राउंडवर एक मधमाशी होती. जी संजय कपूर यांच्या तोंडात गेली आणि तिने संजय यांच्या गळ्याचा चावा घेतला, ज्यामुळे त्यांची श्वासनलिका बंद झाली. ते श्वास घेऊ शकत नव्हते. संजय कपूर यांनी खेळ मध्यभागी थांबवण्याची सूचना केली. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला." अशी सविस्तर माहिती कंगणाने आपल्या पोस्टद्वारे दिली आहे.


ती पुढे अशी देखील म्हणते की अशाप्रकारे मृत्यू येणं ही किती दुःखद बातमी आहे. या प्रकारच्या बातम्या ऐकून मी आता थकले आहे. "२०२५ मध्ये इतक्या विचित्र घटना घडत आहेत. की त्या आपल्या जीवनावर परिणाम करत आहेत. मी प्रार्थना करते की सर्वजण सुरक्षित राहावेत आणि देवाकडे प्रार्थना करत राहावे." असे देखील तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.  करिश्मा कपूरला संजय कपूरपासून दोन मुले आहेत, ज्यांचे नाव समायरा आणि कियान असे आहे, संजय कपूर यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्यांचे करिश्मा आणि त्यांच्या मुलांसोबतचे जून फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 



अहमदाबाद विमान अपघाताबाबत व्यक्त केला शोक


अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान AI171 च्या अपघातानंतर कंगना राणौतने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला होता. या अपघातात जीव गमावलेल्यांसाठी तिने प्रार्थना केली.

Comments
Add Comment

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून

'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.