
देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसाय उत्पादनाचे योगदान मोठे आहे. भारतीय मत्स्यव्यवसायाने २०२३ - २४ मध्ये ६०,५२३.८९ कोटी रुपयांचे १७,८१,६०२ मेट्रिक टन सागरी अन्न अर्थात सीफूड सीफूड निर्यात केले. ही वाढ मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा सर्वात मोठा पुरावा आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेतील मत्स्यव्यवसायाचे योगदान वाढवण्यात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली आहे. महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन २०२३ - २४ मध्ये ४,३४,५७४ मेट्रिक टन होते. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्याचे मत्स्योत्पादन २०२४ - २५ मध्ये २९,१८४ मेट्रिक टनांनी वाढले आणि ४,६३,७५८ मेट्रिक टनांवर पोहोचले.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायदा, १९८१ (सुधारणा-२०२१) च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे, ड्रोन देखरेखीसह, राज्यात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यास मदत झाली आहे. या उपाययोजनांमुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.