जळालेले मालवाहक जहाज टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले

कोची : सिंगापूरचा झेंडा लावलेले एमव्ही वान है ५०३ हे जहाज भारताच्या तटरक्षक दलाने टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले. याआधी सतत पाण्याचा मारा करुन तसेच जहाजावर विशिष्ट रासायनिक पावडरचा मारा करुन मालवाहक जहाजाची आग नियंत्रणात आणण्यात आली. यानंतर तटरक्षक दलाने जळालेले मालवाहक जहाज टो करुन सुरक्षित ठिकाणी हलवले. अर्धवट जळालेल्या जहाजातून काही कंटेनर समुद्रात पडले आहेत. या कंटेनरना शोधून समुद्राबाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच कंटेनरमधील घटकांमुळे पाण्यात घातक रसायने मिसळू नये याची खबरदारी घेण्याचे काम सुरू आहे.

जळालेल्या मालवाहक जहाजावर २२ जण होते. यापैकी १८ जणांना भारताने वाचवले. जहाजावरील चार जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे.

कोचीपासून सुमारे वीस सागरी मैलांवर असलेल्या जहाजाला ६०० मीटर लांबीच्या दोरखंडाने टो करण्यात आले अर्थात ओढण्यात आले आणि जहाज सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

नियमानुसार जहाज मालक आणि विमा कंपनी यांच्यात चर्चा होईल. यानंतर जहाज ज्या देशाच्या सागरी हद्दीत आहे त्या देशाला म्हणजेच भारताला माहिती दिली जाईल. यानंतर मालकाकडून ताबा घेतला जाईपर्यंत जळालेले जहाज भारतीय सागरी हद्दीत देखरेखीत, सुरक्षित ठिकाणी राहील.

अर्धवट जळालेल्या मालवाहक जहाजामुळे भारतीय किनारपट्टीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. सध्या जहाज भारतीय किनाऱ्यापासून ३५ सागरी मैलांवर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे