माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे विमान अपघातात निधन

अहमदाबाद : गुजरातच्या राजकीय इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाल्याची दु:खद घटना गुरुवारी घडली. अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या फ्लाइट AI-171 या बोईंग ७८७-७ ड्रीमलाइनरने दुपारी १.३० वाजता टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच मेघानीनगर भागात कोसळले.


या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. दुसऱ्या रांगेत बसलेले विजय रुपाणी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले, अशी माहिती खासदार परिमल नाथवानी यांनी दिली. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.



विजय रुपाणी आपल्या पत्नी अंजली यांना लंडनहून परत आणण्यासाठी प्रवास करत होते. मात्र, नियतीने वेगळाच खेळ खेळला. त्यांच्या पत्नी लंडनमध्ये असून या दु:खद बातमीने त्यांच्यावर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.


अपघाताचे कारण इंजिन बिघाड किंवा टेकऑफदरम्यान मागच्या भागाने झाडाला धडक झाल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


विजय रुपाणी यांचा जन्म म्यानमारच्या यांगॉन येथे २ ऑगस्ट १९५६ रोजी झाला. लहानपणीच त्यांचे कुटुंब राजकोटमध्ये स्थलांतरित झाले. एबीव्हीपी पासून संघ परिवाराशी त्यांचा संबंध सुरू झाला आणि पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळत २०१६ ते २०२१ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.


गुजरातने केवळ एक राजकारणी नाही, तर एक प्रामाणिक, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्व गमावले आहे.

Comments
Add Comment

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश,