Friday, June 13, 2025

'प्रहार' Exclusive:श्रीराम समुहाने सनलाम समुहासोबत केली धोरणात्मक भागीदारी 'श्रीराम वेल्थ' ब्रँड भारतात लॉन्च

'प्रहार' Exclusive:श्रीराम समुहाने सनलाम समुहासोबत केली धोरणात्मक भागीदारी 'श्रीराम वेल्थ' ब्रँड भारतात लॉन्च
- हे संयुक्त उपक्रम संपूर्ण भारतात संपत्ती व्यवस्थापनाचे लोकशाहीकरण करण्यासाठी सज्ज

- ५ वर्षांत ५०० संपत्ती व्यावसायिकांना सामील करण्याची कंपनीची योजना

मोहित सोमण: श्रीराम समुहाने आज अधिकृतपणे सनलाम समुहाशी हातमिळवणी करत आज भारतीय वेल्थ मॅनेजमेंट क्षेत्रात प्रवेश केला होता.यावेळी बोलताना समुहाने आम्ही ग्राहकांना उच्च दर्जाच्या सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.यावेळी 'नागपूरसह इतर दोन महत्त्वाच्या शहरातही सेवा आगामी काळात विस्तारित करण्याचे आमचे नियोजन आहे.'असेही कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले.श्रीराम वेल्थ लिमिटेडने दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध वित्तीय सेवा कंपनी सनलाम कंपनीशी धोरणात्मक भागीदारी करत भारतीय उपखंडात आज प्रवेश केला आहे.

श्रीराम वेल्थचे उद्दिष्ट भारतातील श्रीमंत आणि संपन्न निव्वळ (High Net Worth) संपत्ती असलेल्या गुंतवणूकदारांच्या वाढत्या आधाराला सेवा देणे आहे,ज्यामध्ये व्यवहारांपेक्षा संबंधांना प्राधान्य देऊन वैयक्तिकृत उपायांचा समावेश आहे.

या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित १५० वर्षांचा इतिहास आहे.वित्तीय सेवा विशेषज्ञ म्हणून या कंपन्या ओळखल्या जातात.या दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने आर्थिकदृष्ट्या ५०-५० भागभांडवल या दोन्ही कंपन्याचे असणार आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,कंपनी मोठ्या प्रमाणात भारतीय टियर १,२ या शहरातदेखील कंपनीचा मोठ्या प्रमाणात कार्यालय उघडण्याचा मानस आहे.श्रीराम समुहाची कंपनी श्रीराम वेल्थ ही वेल्थ मॅनेजमेंट,मालमत्ता व्यवस्थापन (Asset Management) या सेवासह इतर वित्तीय सल्ला व गुंतवणूक सेवा ग्राहकांना प्रदान करणार आहे.

कंपनीने म्हटल्याप्रमाणे,श्रीराम वेल्थ कंपनी ही वेल्थ मॅनेजमेंट,कर्जपुरवठा (Lending Solutions),प्रोटेक्शन सोल्यूशन,गुंतवणूक सेवा,आर्थिक वारसा नियोजन अशा विविध प्रकारच्या सेवा ग्राहकांना प्रदान करणार आहे.२०४७ पर्यंत भारताचे ३५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न आहे ते सत्यात आणण्यासाठी तसेच १० ट्रिलियन डॉलर्स मूल्यांकनाचा वेल्थ मॅनेजमेंट बाजार विकसित करण्यासाठी कंपनी आपला हातभार देण्यासाठी उत्सूक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

पुढील वर्षापर्यंत टियर २,३ मधील २० शहरात कंपनीला आपले कार्यक्षेत्र वाढवायचे आहे. त्यामुळे प्रभावीपणे कंपनीच्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने कंबर कसली असून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Inteligence) च्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंपनी आपली उत्पादने सहजतेने लोकांपर्यंत पोहोचवणार आहे.कंपनीचे असेट अंडर अँडव्हाईस (AUA) पुढील पाच वर्षांत ५०००० कोटी मूल्यांची करण्यास श्रीराम वेल्थ इच्छूक आहे.यासाठी कंपनीच्या दाव्याप्रमाणे भारतीय आर्थिक संपत्ती व्यवस्थापनात केवळ समावेश नाही तर या बाजारात सर्वसमावेशकता आणि नेतृत्वही करण्याकडे कंपनीचा कल आहे.

कंपनीने विशेषतः तीन श्रेणींमध्ये विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.मोठ्या प्रमाणात,उदयोन्मुख आणि उच्चभ्रू,ज्यामध्ये १० लाख ते २ कोटी रुपयांच्या श्रेणीतील ग्राहक असतील. २ कोटी ते २५ कोटी रुपयांच्या दरम्यान उच्च संपत्ती असलेल्या व्यक्ती आणि २५ कोटी रुपये आणि त्यावरील श्रेणीतील अल्ट्रा एचएनआय (High Networth Individuals) असतील.श्रीराम कंपनी व्यतिरिक्त सनलाम (Sanlam) कंपनी भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छूक होती.गेल्या दशकातील भारताच्या अर्थव्यवस्थेला आलेल्या उभारीमुळे अनेक परदेशी संस्थात्मक समुह भारतात गुंतवणूकीसाठी इच्छूक होते.

नुकत्याच मे महिन्यात एसआयपीमध्ये गुंतवणूक तब्बल २६८८८ कोटींवर पोहोचली होती. मात्र अशा परिस्थितीत एकत्रित म्युचल फंड गुंतवणुकीत घट होऊन १९०१३ कोटींची गुंतवणूक झाली आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही कंपनी भारताकडे सकारात्मक नजरेने पाहते. कंपनीच्या मते 'बाजारात नेहमीच गुंतवणूकीची संधी असते ती आपण शोधली पाहिजे.'

आज या कंपनीच्या स्थापनवेळी'श्रीराम वेल्थसह,आमचे ध्येय सर्वात विश्वासार्ह भागीदार बनणे,क्लायंट संपत्ती वाढवणे आणि कालांतराने टिकणारे मूल्य निर्माण करणे आहे. सनलमच्या जागतिक गुंतवणूक ज्ञानाच्या सहकार्याने,आमचे ध्येय भारतातील वाढत्या गुंतवणूकदार बेससाठी पारदर्शक,संशोधन चालित आणि संबंध-प्रथम उपाय प्रदान करणे आहे 'अशी प्रतिक्रिया देत श्रीराम वेल्थचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD CEO) विकास सतीजा म्हणाले आहेत.

श्रीराम कॅपिटलच्या एमडी आणि सीईओ सुभाश्री श्रीराम म्हणाल्या,'श्रीराम वेल्थ हे श्रीराम ग्रुपच्या विकासाच्या पुढील अध्यायाचे प्रतिनिधित्व करते.हे केवळ संयुक्त उपक्रम नाही-लाखो भारतीयांसाठी आर्थिक समृद्धी उघडण्याचे हे एक ध्येय आहे.२०४७ पर्यंत ३५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाशी आणि १० ट्रिलियन डॉलर्सच्या अंदाजित संघटित संपत्ती व्यवस्थापन बाजारपेठेशी सुसंगत,श्रीराम वेल्थ सुलभ एआय-सक्षम सेवांसह अनेक मार्गांनी संपत्तीचे लोकशाही करण करण्यास सज्ज आहे. हा उपक्रम भारतातील शीर्ष १० शहरांमध्ये कामकाज सुरू करेल, पुढील वर्षी २० शहरांमध्ये विस्तार करेल, टियर २ आणि टियर ३ बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करेल, जिथे श्रीराम ग्रुपची दीर्घकालीन ब्रँड इक्विटी आहे.'

याविषयी प्रतिक्रिया देताना,' भारताची अर्थव्यवस्था वाढत असताना आणि लोक श्रीमंत होत असताना संपत्ती व्यवस्थापनाला आम्ही एक नैसर्गिक उत्क्रांती मानतो. आमचे उद्दिष्ट केवळ पैशाचे व्यवस्थापन करणे नाही तर अर्थपूर्ण उपाय तयार करणे आहे.हे अल्पकालीन खेळ नाही; आम्ही पुढील १०० वर्षांसाठी भारतात एक विश्वासार्ह,ग्राहक-प्रथम संपत्ती व्यवसाय तयार करण्यासाठी येथे आलो आहोत' असे सॅनलम ग्रुपचे सीईओ पॉल हॅनरॅटी म्हणाले आहेत.

'प्रहार' शी बोलताना श्रीराम वेल्थचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सतीजा म्हणाले, 'आम्ही भारतातील विविध शहरात उत्कृष्ट सेवा देण्यासाठी तयार आहोत. केवळ व्यवसायिकदृष्ट्या नाही तर ग्राहकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्व तयारीस बाजारात आलो आहोत.आम्हाला खात्री आहे की ग्राहकांचे प्रश्न सोडवताना आर्थिक जागृती आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. टियर २,टियर ३ शहरात आर्थिक क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण आहे. अजून आम्ही भारतातील टियर २, ३ शहरात पूर्णपणे पोहोचलो नसलो तरी भविष्यात खूप मोठ्या संधी आहेत. त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आज ग्राहकाला योग्य उत्पादन देण्याची गरज आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी योग्य सानूकूलित (Customised) उत्पादन देणे ही काळाची गरज आहे. नक्कीच आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत. येणाऱ्या काळात आम्ही भविष्यात ग्राहकांची गरज काय हे लक्षात घेऊनच त्याला उत्पादन ऑफर करू शकतो. यातूनच आम्ही प्रतिकियाशिल (Reactive) राहण्यापेक्षा अधिक सक्रिय (Proactive) राहू असा आम्हाला विश्वास आहे.'

यापूर्वी अलीकडेच,समूहाने मालमत्ता पुनर्बांधणीमध्ये (Restructuring) प्रवेश करण्याची घोषणा केली होती, रिटेल-केंद्रित एआरसी (ARC) स्थापन करण्यासाठी ३०० कोटी रुपये देण्याची योजना असल्याचे म्हटले होते. श्रीराम वेल्थ आपल्या गाभ्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Inteligence) अंतर्भूत करत आहे ज्यामुळे वैयक्तिकृत सल्लागार,अधिक स्पष्ट जोखीम प्रोफाइलिंग (Profiling) आणि रिअल-टाइम पोर्टफोलिओ शिफारसी सक्षम होत आहोत असे कंपनीने म्हटले आहे.कंपनी 'डिजिटल फर्स्ट 'दृष्टीकोन ठेवून या क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा घडवून आणू इच्छिते असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >