
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मेट्रो-३ मार्गिकवरील प्रवासी संख्या बऱ्यापैकी वाढेल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (एमएमआरसी) होता; परंतु दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन एक महिना पूर्ण झाला तरी दैनंदिन प्रवासी संख्येत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. या मार्गिकेवर दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या आसपास आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक नसून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आता एमएमआरसीने थेट खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, कोणते पर्याय स्वीकारता येतील याचा अभ्यास करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरसीने निविदा मागविल्या आहेत.

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी स्वरांगी ...
एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो-३ मार्गिकेचे काम करीत आहे. यातील आरे ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे, तर महिन्याभरापूर्वी १० मे रोजी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आरे-बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करताना या मार्गिकेवरून अंदाजे चार लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र या टप्प्याला प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
त्यामुळेच या मार्गिकेवरून दिवसाला अवघे २० हजार प्रवासी प्रवास करीत होते. या मार्गिकेतील बीकेसी–आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा एमएमआरसीला होती. त्यानुसार प्रवासी संख्येत काहीशी वाढ झाली आहे. मात्र ही वाढ मोठी, समाधानकारक नाही. यासाठी एमएमआरसीने नुकत्याच इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.