'ताज लँड्स'मध्ये बंद दाराआड चाललंय काय ? महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार ?

मुंबई : उद्धव सेना ही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या काही दिवस येत होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईत 'ताज लँड्स' हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. दोघांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली. चर्चेविषयी सविस्तर माहिती देणे दोन्ही नेत्यांनी चतुराईने टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री आणि राज यांच्यातील चर्चेमुळे उद्धव सेना आणि मनसे यांची संभाव्य युती होण्याआधीच तुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वांद्र्यातील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये सकाळीच मनसे प्रमुख राज ठाकरे पोहोचले. थोड्या वेळाने तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली. याआधी मागील दोन महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव सेना ही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करणार असल्याची चर्चा होत होती. निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज यांनी युतीचा विचार करत असल्याचे संकेत दिले होते. मात्र दोन्ही पक्षांमध्ये युतीला पूरक अशी चर्चा झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर गुरुवार १२ जून रोजी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीचा कार्यक्रम आधी जाहीर झालेला नव्हता. यामुळेच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेल्या चर्चेअंती उद्धव सेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चेचा दी एंड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून महायुतीसाठी काही चांगलं होणार असेल तर या भेटीचे आम्ही स्वागत करतो; असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय चतुराईची कल्पना साऱ्यांना आहे आणि राज ठाकरे हे स्वतंत्र राजकीय विचारांचे आहेत. यामुळे काय चर्चा झाली किंवा काय ठरलं याचे अंदाज करण्यापेक्षा त्यांच्याकडून अधिकृतपणे काय सांगितलं जातं आणि कधी सांगितलं जातं याची वाट बघणेच योग्य होईल; असेही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शिंदेंची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर या दोघांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे पुन्हा एकदा मनसे महायुतीत प्रवेश करणार का ? या चर्चेला उधाण आले आहे.
Comments
Add Comment

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी