प्रहार    

Ahmedabad plane crash: टाटा सन्स मृतकांच्या वारसांना देणार १ कोटींची मदत

  75

Ahmedabad plane crash: टाटा सन्स मृतकांच्या वारसांना देणार १ कोटींची मदत

अपघातात क्षतीग्रस्त झालेले रुग्णालय देखील उभारणार


टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची घोषणा


मुंबई : गुजरातच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा (फ्लाईट क्र. एआय 171) आज, गुरुवारी अपघात झाला. यात क्रू-मेंबर्ससह 242 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी शोक व्यक्त करत अपघातातील मृत प्रवाशांच्या वारसांना १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात टाटा सन्सकडून संध्याकाळी ७.३० वाजता अधिकृत घोषणा करण्यात आली.


एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर हे विमान कोसळून प्रवासी आणि क्रू मेबर्स अशा २४२ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटामध्ये हे विमान कोसळले. या विमान अपघातानंतर टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी एक शोक व्यक्त केला. आपल्या शोकसंदेशात एन. चंद्रशेखरन म्हणाले की, आम्हाला एअर इंडियाच्या अपघाताचे मनापासून दु:ख झाले आहे.


या क्षणी आम्हाला झालेले दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, तसेच जे जखमी झाले आहेत, त्या सर्वांच्या आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. तसेच या दुःखद घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा समूह १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देईल. तसेच जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय खर्च आम्ही करू आणि त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार व सहकार्य मिळेल याची काळजी घेऊ. याशिवाय, बी जे मेडिकलच्या होस्टेलच्या उभारणीसाठीही आम्ही मदत करू, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले. या कठीण काळात ज्या कुटुंबांवर हे दुःख कोसळले आहे, त्यांच्या आम्ही ठामपणे उभे आहोत अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी

तुमचे ICICI बँकमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची...

आयसीआयसीआय बँकेचा यूटर्न, बचत खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा केली कमी मुंबई: आयसीआयसीआय बँकेने नुकतीच नवीन

चीनचे परराष्ट्र मंत्री पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन प्रशासनाद्वारे ५० टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यावर, चीन आणि

महाराष्ट्रातील १५ सरपंच स्वातंत्र्यदिनी दिल्लीत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

९ महिला सरपंचांचा समावेश नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी

Minta Devi: काँग्रेसची पोलखोल! बिहारमधील '१२४ वर्षीय' मिंटा देवी कॅमेऱ्यासमोर आल्या, काय म्हणाल्या पहा...

बिहार: बिहारमध्ये राहणाऱ्या मिंटा देवीचा फोटो आणि नावाचा वापर करून काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केले होते. या

Stray Dog Shelter : कुत्र्यांमुळे मृत्यू झालेल्यांना परत आणणार आहात का? सुप्रीम कोर्टाने प्राणीप्रेमींना धरले फैलावर; काय आहेत कोर्टाचे कडक आदेश?

नवी दिल्ली : मुंबईत कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद थंड पडलेला नाही, तसेच दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या