वन्यप्राण्यांना दत्तक घेण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांचे पालकत्व घेता येणार असून त्याबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने घोषणा केली आहे. वर्षभर वाघ, सिंहाचे पालकत्व घेण्यासाठी प्रत्येकी साधारण तीन लाख रुपये, तर बिबट्यासाठी दीड लाख रुपये मोजावे लागणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्यप्राणी दत्तक योजना राबविण्यात येते. या योजनेनुसार वाघ ३ लाख १० हजार रुपये, सिंह ३ लाख रुपये, बिबट्या १ लाख २० हजार रुपये, वाघाटी ५० हजार रुपये, नीलगाय ३० हजार रुपये आणि हरिण २० हजार रुपये भरून वर्षभरासाठी दत्तक घेता येणार आहे.


यापूर्वी मंत्री रामदास आठवले यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या दत्तक घेतला होता. तसेच सामाजिक कार्यकर्त्या साधना वझे या अनेक वर्षे बिबट्याला दत्तक घेत आहेत. याचबोरबर प्रताप सरनाईक, अभिनेता समुमित राघवन यांनीही प्राणी दत्तक घेतले आहेत. तसेच दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनीही २०२१ पासून विविध वन्य प्राणी दत्तक घेतले होते.


वन्य प्राण्यांचा आहार, उपचारांवरील खर्च, तसेच मानवी साखळीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या वन्य प्राण्याविषयी शहरवासीयांची जवळीक वाढावी या उद्देशाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांच्या प्रजाती एक वर्षांच्या करारावर दत्तक घेता येतात. वर्षभर प्राण्यांचा आहार व उपचाराचा खर्च संबंधिताला दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो.


केवळ आर्थिक मदतीपुरती ही योजना मर्यादित नाही. यामुळे वन्यजीवांविषयी सामान्य नागरिकांना प्रेम, आपुलकी वाटावी हा या योजनेमागे उद्देश आहे. तसेच एखादा वन्यप्राणी दत्तक घेतल्यास त्या व्यक्तीला त्याचे पालकत्व स्वीकारल्याचे प्रमाणपत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून देण्यात येते. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फलक त्या प्राण्याच्या पिंजऱ्यजवळा लावण्यात येतो. तसेच आठवड्यातून एकदा कुटुंबासह त्या प्राण्याची नि:शुल्क पाहणी करता येते. या योजनेअंतर्गत सिंह, वाघ, वाघाटी, बिबट्या, नीलगाय आणि हरिण या वन्यजीवांना दत्तक घेता येते.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या