
आयसीसीने २०२३ ते २०२५ दरम्यानच्या कसोटी मालिकांचा विचार करुन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी २०२३ ते २०२५ दरम्यान खेळलेल्या मालिकांतील जिंकण्याचे प्रमाण टक्केवारीच्या स्वरुपात सर्वोत्तम असलेल्या दोन संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळेल हे निश्चित होते. भारताने आधीच्या दोन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यामुळे भारत हॅटट्रिक करेल असा अंदाज व्यक्त होत होता. पण भारतीय संघ घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हरला. नंतर ऑस्ट्रेलियात जाऊन भारत खेळला. तिथे भारताचा ३-१ असा पराभव झाला. या दोन मालिकांतील पराभवांमुळे भारताच्या विजयाची टक्केवारी घसरली आणि हॅटट्रिक हुकली. याचा फटका मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीला बसला.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ - २०२५
संघ - जिंकण्याचे प्रमाण (टक्केवारी)
- दक्षिण आफ्रिका - ६९.४४
- ऑस्ट्रेलिया - ६७.५४
- भारत - ५०
- न्यूझीलंड - ४८.२१
- इंग्लंड - ४३.१८
- श्रीलंका - ३८.४६
- बांगलादेश - ३१.२५
- वेस्ट इंडिज - २८.२१
- पाकिस्तान - २७.९८