
आरोग्य विभागात ४० अल्पवयीन मातांची नोंद
तलासरी : मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये असा कायदा असताना व कायज्ञाने बालविवाहावर बंदी असल्याने अनेक ठिकाणी बाल विवाह होत नाहीत, असे असले तरी तलासरीसारख्या आदिवासी भागात बाल विवाह होत नसले तरी अल्पवयातच प्रेम संबंधाने माता होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई : वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं तसं अवघडच. जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांची साथ, पाठिंबा महत्त्वाचा ...
प्रेम संबंधाने विवाह न करता अल्प वयातच तरुण-तरुणी एकत्र राहत असल्याने अल्पवयीन माताच्या प्रमाण तलासरी भागात मोठ्या प्रमाणात असले आरोग्य विभागाच्या दप्तरी मात्र ४० अल्पवयीन मातांची नोंद आहे. यामध्ये उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र ०३ माता, वसा प्राथमिक आरोग्य केंद्र ०६ माता, सूत्रकार प्राथमिक आरोग्य केंद्र ११ माता, आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र २० माता, अशी आकडे वारी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णीयांनी दिली.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव यामुळे अल्प वयातच मुली शिक्षण सोडून रोजगारासाठी बाहेर पडतात, तलासरी भागात रोजगाराच्या संधी नसल्या तरी बाजूच्या गुजरात राज्य, केंद्र शासित दादरा नगर हवेलीमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. या कारखान्यात तलासरी, डहाणू तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मजूर कामाला जातो, या मजुरामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त आहे, तेथे या अल्पवयीन मुलांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण होते पण या शोषणाकडे कोणाचेही लक्ष नाही. या समस्येला सामोर जाण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.