Crisil Thali Report: मे महिन्यात घरगुती थाळी ६ टक्क्याने स्वस्त - क्रिसील अहवाल

प्रतिनिधी: क्रिसिल (CRISIL) रिसर्चने आपला नवा अहवाल प्रदर्शित केला आहे. त्यांनी आपल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्षे आधारावर (Year on Year YoY) बेसिसवर घरगुती शाकाहारी व मांसाहारी थाळी ६ टक्क्याने स्वस्त झाल्या आहेत. यानुसार मे महिन्यात शाकाहारी थाळीच्या किंमती 'जैसे थे' राहिल्या असून मांसाहारी थाळीत २ टक्क्याने घट झाली. याशिवाय कंपनीच्या अहवालानुसार खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये आयातीवरील वाढविलेल्या शुल्कामुळे तब्बल १९ टक्के वाढल्याचे म्हटले आहे. क्रिसिलच्या विश्लेषणानुसार, गेल्या वर्षी उत्पादनाच्या चिंतेमुळे टोमॅटोच्या किमती वाढल्या होत्या, त्यामुळे मे २०२५ मध्ये टोमॅटोचे दर ३३ रुपये प्रति किलोवरून २९ टक्क्यांनी घसरून २३ रुपये प्रति किलो झाले.


एलपीजी गॅस मध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे या शाकाहारी थाळीच्या किंमती कमी होऊ शकल्या नाहीत असे अहवालात म्हटले आहे. मासाच्या खासकरून ब्रोइलर मधील वर्षाला ६ टक्के घट झाल्याने मांसाहारी (Non Veg) थाळीच्या किंमतीत घट झाली.महाराष्ट्रातही मागणीपेक्षा पुरवठ्यात वाढ झाल्याने या मांसाहारी थाळीच्या किंमती नियंत्रित राहिल्या असे निरिक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. रब्बी हंगामातील कमी क्षेत्र आणि उत्पादनामुळे कांद्याचे भाव वाढले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी होती.


मे महिन्यात शाकाहारी (Veg) थाळीचे दर मात्र नियंत्रित राहिले आहेत तर पुन्हा एकदा मांसाहारी थाळीत २ टक्क्याने घट झाली आहे. याशिवाय बटाटा आणि टोमॅटोच्या किंमती महिन्याला अनुक्रमे ३% आणि १०% ने वाढल्या, तर कांद्याच्या किमती १०% घसरल्या, ज्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमती महिन्याला बदलल्या नाहीत. ब्रॉयलरच्या किमतीत अंदाजे ४% घट झाल्याने मांसाहारी थाळीच्या किमतीत घट झाली.

Comments
Add Comment

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.