Crisil Thali Report: मे महिन्यात घरगुती थाळी ६ टक्क्याने स्वस्त - क्रिसील अहवाल

प्रतिनिधी: क्रिसिल (CRISIL) रिसर्चने आपला नवा अहवाल प्रदर्शित केला आहे. त्यांनी आपल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्षे आधारावर (Year on Year YoY) बेसिसवर घरगुती शाकाहारी व मांसाहारी थाळी ६ टक्क्याने स्वस्त झाल्या आहेत. यानुसार मे महिन्यात शाकाहारी थाळीच्या किंमती 'जैसे थे' राहिल्या असून मांसाहारी थाळीत २ टक्क्याने घट झाली. याशिवाय कंपनीच्या अहवालानुसार खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये आयातीवरील वाढविलेल्या शुल्कामुळे तब्बल १९ टक्के वाढल्याचे म्हटले आहे. क्रिसिलच्या विश्लेषणानुसार, गेल्या वर्षी उत्पादनाच्या चिंतेमुळे टोमॅटोच्या किमती वाढल्या होत्या, त्यामुळे मे २०२५ मध्ये टोमॅटोचे दर ३३ रुपये प्रति किलोवरून २९ टक्क्यांनी घसरून २३ रुपये प्रति किलो झाले.


एलपीजी गॅस मध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे या शाकाहारी थाळीच्या किंमती कमी होऊ शकल्या नाहीत असे अहवालात म्हटले आहे. मासाच्या खासकरून ब्रोइलर मधील वर्षाला ६ टक्के घट झाल्याने मांसाहारी (Non Veg) थाळीच्या किंमतीत घट झाली.महाराष्ट्रातही मागणीपेक्षा पुरवठ्यात वाढ झाल्याने या मांसाहारी थाळीच्या किंमती नियंत्रित राहिल्या असे निरिक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. रब्बी हंगामातील कमी क्षेत्र आणि उत्पादनामुळे कांद्याचे भाव वाढले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी होती.


मे महिन्यात शाकाहारी (Veg) थाळीचे दर मात्र नियंत्रित राहिले आहेत तर पुन्हा एकदा मांसाहारी थाळीत २ टक्क्याने घट झाली आहे. याशिवाय बटाटा आणि टोमॅटोच्या किंमती महिन्याला अनुक्रमे ३% आणि १०% ने वाढल्या, तर कांद्याच्या किमती १०% घसरल्या, ज्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमती महिन्याला बदलल्या नाहीत. ब्रॉयलरच्या किमतीत अंदाजे ४% घट झाल्याने मांसाहारी थाळीच्या किमतीत घट झाली.

Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ - गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे संकेत; मदरशांची होणार सखोल पडताळणी

मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार