Crisil Thali Report: मे महिन्यात घरगुती थाळी ६ टक्क्याने स्वस्त - क्रिसील अहवाल

  48

प्रतिनिधी: क्रिसिल (CRISIL) रिसर्चने आपला नवा अहवाल प्रदर्शित केला आहे. त्यांनी आपल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्षे आधारावर (Year on Year YoY) बेसिसवर घरगुती शाकाहारी व मांसाहारी थाळी ६ टक्क्याने स्वस्त झाल्या आहेत. यानुसार मे महिन्यात शाकाहारी थाळीच्या किंमती 'जैसे थे' राहिल्या असून मांसाहारी थाळीत २ टक्क्याने घट झाली. याशिवाय कंपनीच्या अहवालानुसार खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये आयातीवरील वाढविलेल्या शुल्कामुळे तब्बल १९ टक्के वाढल्याचे म्हटले आहे. क्रिसिलच्या विश्लेषणानुसार, गेल्या वर्षी उत्पादनाच्या चिंतेमुळे टोमॅटोच्या किमती वाढल्या होत्या, त्यामुळे मे २०२५ मध्ये टोमॅटोचे दर ३३ रुपये प्रति किलोवरून २९ टक्क्यांनी घसरून २३ रुपये प्रति किलो झाले.


एलपीजी गॅस मध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे या शाकाहारी थाळीच्या किंमती कमी होऊ शकल्या नाहीत असे अहवालात म्हटले आहे. मासाच्या खासकरून ब्रोइलर मधील वर्षाला ६ टक्के घट झाल्याने मांसाहारी (Non Veg) थाळीच्या किंमतीत घट झाली.महाराष्ट्रातही मागणीपेक्षा पुरवठ्यात वाढ झाल्याने या मांसाहारी थाळीच्या किंमती नियंत्रित राहिल्या असे निरिक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. रब्बी हंगामातील कमी क्षेत्र आणि उत्पादनामुळे कांद्याचे भाव वाढले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी होती.


मे महिन्यात शाकाहारी (Veg) थाळीचे दर मात्र नियंत्रित राहिले आहेत तर पुन्हा एकदा मांसाहारी थाळीत २ टक्क्याने घट झाली आहे. याशिवाय बटाटा आणि टोमॅटोच्या किंमती महिन्याला अनुक्रमे ३% आणि १०% ने वाढल्या, तर कांद्याच्या किमती १०% घसरल्या, ज्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमती महिन्याला बदलल्या नाहीत. ब्रॉयलरच्या किमतीत अंदाजे ४% घट झाल्याने मांसाहारी थाळीच्या किमतीत घट झाली.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने