मुलांची यंत्रे करणे केव्हा थांबेल?

  20

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर


अनेक विचारवंतांनी मांडलेल्या शिक्षण विचाराचा आढावा घेताना गांधीजींच्या विचाराकडे मन पुन्हा पुन्हा थबकते आहे. गांधीजी शिक्षणाच्या बौद्धिक अंगापेक्षा सांस्कृतिक, नैतिक अंगाला महत्त्व देतात. मातृभाषेतील शिक्षण हा त्यांच्या शिक्षण विचाराच्या केंद्रस्थानी आहे. राज्यकर्त्यांच्या भाषेला अधीन झाल्याने आपण परक्या भाषेला शरण गेलो. शिक्षणाबाबत गांधीजींची मते ठाम होती. परकी भाषा मुलांवर लादणे म्हणजे त्यांच्यावर अकारण भार लादणे आणि त्यामुळे त्यांचा स्वाभाविक विकास खुंटवणे.


मुलांच्या स्मरणशक्तीचा विकास आणि सर्जनशक्तीचा विकास होण्याकरिता मातृभाषा महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षणाच्या माध्यमाबद्दल गांधीजी म्हणतात, ‘अनेकांकडे मातृभाषेतील शब्दसंपत्ती इतकी तोकडी आहे की इंग्रजी शब्द व वाक्ये यांचा आधार घेतल्याशिवाय आपले भाषण पुरे करता येत नाही. मुलांच्या ठिकाणी असलेल्या आंतरिक गुणांच्या प्रकटीकरणात खरे शिक्षण आहे. त्यांची स्वतंत्र विचारशक्ती मारली जाऊन ती यंत्रवत बनणे गांधीजींना धोक्याचे वाटते.


बालशिक्षणाबाबत गांधीजी म्हणतात, ‘बालकांच्या शिक्षणातले विषय खरे तर सोप्यात सोपे असायला हवेत पण आपण ते अवघड बनवलेले आहेत. ‘किती खरे आहे हे! विषय अवघड नि त्यात ते शिकवण्याची पद्धतदेखील अवघड, असे असल्यावर विद्यार्थी हौसेने शिकतील कसे?


बालशिक्षणाच्या क्षेत्रात आणि मुख्यतः आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ज्यांनी मूलभूत काम केले आहे अशा ताराबाई मोडक यांची भेट जेव्हा गांधीजींशी झाली तेव्हा त्या भेटीत गांधीजींनी ताराबाईंच्या शिक्षणविषयक प्रयोगांचे कौतुक केले. बालशिक्षणाकरिता भारतीय बैठक तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले. भारतीय समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, परिस्थितीशी मिळतीजुळती शिक्षण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. शैक्षणिक साधने अशी हवीत जी कुणालाही परवडू शकतील. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी महाराष्ट्रात बालशिक्षणाची जी पायाभरणी केली, तिने एक वेगळा आदर्श निर्माण केला.


मुलांनी हौसेने शिकावे म्हणून शैक्षणिक साधनांचा उपयोग करणे ही एक कला आहे. ती आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. तसेच अभिव्यक्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. ताराबाई आणि अनुताई यांनी नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करून, साधनांची निर्मिती करून अध्यापन करण्याचा वस्तुपाठ शिक्षकांना घालून दिला. गोष्ट रचणे, ती सांगणे, बडबडगीते-शिशुगीते म्हणणे, पाने, फुले, शिंपले या सर्वांसकट स्वतःच्या भाषेत व्यक्त होण्याचे मोल खूप मोठे आहे, हा संस्कार मनावर बिंबवणारा शिक्षण विचार जेव्हा समजेल तेव्हा बालवयात आपल्या भाषेचा बळी देऊन पालक मुलांवर परक्या भाषेचे ओझे लादणार नाहीत.

Comments
Add Comment

भिंत...

माेरपीस : पूजा काळे कविता मानवी मनाचे प्रतिबिंब दर्शवितात. एखाद्या गोष्टीचा तळ गाठल्याने अंतर्मनाला जे उमगतं ते

भारतातील पहिली महिला बाऊन्सर

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे २९ मे रोजी खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून १७ मुलींची पहिली तुकडी

उन्माद आणि बेपर्वाई...

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने पंजाब किंग्जला हरवून तब्बल १८ वर्षांनंतर आयपीएलचा

काैतुकाने : बोलू मराठी!

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या बाई डॉ. विजया वाड यांनी एका उपक्रमात सहभागी करून

दिल दोस्ती दुनियादारी...

माेरपीस : सपूजा काळे दोस्तों के नाम का एक खत जेब में रख कर क्या चला, करीब से गुजरने वाले पूछते है, इस इत्र का नाम क्या

दूरदर्शी, पर्यावरणवादी कार्यकर्त्या...

दी लेडी बॉस:अर्चना सोंडे तीएका दलित कुटुंबातील निरक्षर घरकामगार, भाळी अकाली आलेलं वैधव्य. पण तिने आपलं गाव, डोंगर,