संवाद एकाकी फुलाशी

  54

सहजच : शुभांगी मांडे खारकर


त्या फुलाला कुणीतरी विचारलं, एकटा एकटा राहतोस कंटाळा नाही येत? भीती नाही वाटत? त्यावर ते चिमुकले फूल म्हणाले, अरे एकटा कुठे आहे मी? सकाळ झाली की गुंजन करत भवरा येतो की आणि आजूबाजूच्या झाडांची खबरबात मला देतो. दोन घटका त्याचंही मन मोकळं होतं आणि माझंही.


वारा तर सतत माझ्याभोवती रुंजी घालत असतो. कधी झुळूक बनून तर कधी सुसाट. पावसाला तर माझी इतकी काळजी की कितीही जोरात आला तरी माझ्या अंगावर मात्र हळुवार तुषार टाकतो बघ. पुरतात मला तेव्हढे आणि सकाळची कोवळी उन्हाची तिरीप माझी ख्यालीखुशाली विचारून भरकन बाजूला होते. आता सांग कुठे मी एकटा आहे?


आज सकाळी मात्र शाळेत जाताना एका मुलाने पायाने एक दगड इतक्या जोरात उडवला, की माझा तर जीवच घाबरला. लागला नाही मला तो दगड. पण नीट निरखून पाहिलं मी त्या लेकराकडे तेव्हा रडवेला चेहरा झाला होता रे त्याचा. आई रागावली होती की काय कुणास ठाऊक.


परवा तर मजाच झाली बघ. पांढऱ्या पांढऱ्या केसांची एक आजी डुलत डुलत माझ्याजवळ येऊन थांबली आणि खुदकन हसली! मी पण हसलो... काय आठवलं असेल रे तिला? अशी सोबत होते बघ मला, मग मी एकटा कसा?


ते बघ, ते आजोबा येत आहेत ना... अरे समोर बघ ना, वेंधळाच आहेस अगदी. अरे हे जवळ येऊन थांबले आहेत ना, ते आजोबा... रोजच माझ्या जवळ येऊन थांबतात, मग डोळे पुसत पुसत पुढे निघून जातात. मला पण वाईट वाटतं बघ. पण विचारणार कसं? कुणाच्या आठवणीने असे उदास होत असतील रे? पाहिलंस, किsssती वेळ झाला तुझ्याशी गप्पा मारत बसले आहे मी. तू तुझ्या बाटलीमधलं पाणी दिलंस मला आणि फोटो तर सतत काढतच आहेस. कसे आले आहेत ते फोटो?


आता नाही ना मी एकटा वाटत? अरे एकटं कुणी नसतच या जगात. माणसं, झाडं, प्राणी, पक्षी, सूर्य, चंद्र, चांदण्यांनी भरलेलं आभाळ कळलं...!


आणि एक सांगू एकटं असलं तरी चालतं रे पण कुणी एकाकी होऊ नये इतकच...!

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले