Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे लागणार आहे. एक कर्णधार आणि एक फलंदाज म्हणून गिलची या दौऱ्यात चांगलीच कसोटी असेल. त्यातच गेल्या १८ वर्षांपासून भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे जे महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीला जमले नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार का? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.



शुभमन गिलच्या हाती भारतीय संघ 


भारताने २००७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये १-० ने कसोटी मालिका जिंकली होती. विशेष म्हणजे या कसोटी मालिकेतील विजयी संघात भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीरही होते. मात्र, त्यानंतर टीम इंडियाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत विजय साकारता आला नाही. २०११ आणि २०१४ मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दौरा केला होता. त्या दौऱ्यातही भारताच्या पदरी निराशाच पडली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१८ आणि २०२२ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. २०१८ मध्ये भारताला कसोटी मालिकेत १-३ पराभूत व्हावं लागलं होतं. तर २०२२ मधील कसोटी मालिका भारताने २-२ ने बरोबरीत सोडवली होती. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोन दिग्गजांना इंग्लंडच्या धरतीवर कसोटी मालिका विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलच्या भारतीय संघाकडे हा इतिहास बदलण्याची नामी संधी आहे.


भारताला ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये १-३ पराभव सहन करावा लागला होता. या दौऱ्यात आर. अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर इंग्लंड दौरा सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता या तीन अनुभवी क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत गिल आणि गंभीर जोडी भारताला १८ वर्षांनी कसोटी मालिका जिंकून देण्यात यशस्वी ठरते का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल