Azaan controversy: ‘अजान’वरून राजकारण? पोलिसांचे पाऊल कायद्याच्या चौकटीतच!

मुंबई : मुंबई पोलिसांनी अजानसाठी वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकर्सवर कारवाई सुरू केल्यानंतर काही मुस्लिम संस्थांनी विरोध दर्शवला आहे. मात्र पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, ही कारवाई कोणत्याही धर्माविरोधात नसून केवळ 'ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायदा' आणि बॉम्बे उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार केली जात आहे.


मस्जिद ट्रस्टींनी आवाजाची मर्यादा पाळावी, असे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात आले होते. तरीही, काही ठिकाणी नियमांचं पालन न केल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. सकाळी ६ पूर्वी किंवा रात्री १० नंतर जोरात लाऊडस्पीकर लावणं कायद्याने गुन्हा आहे. हे स्पष्ट असूनही काही व्यक्ती त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे.



साकीनाका येथील मस्जिद अजमेरी आणि मदरसा अली हसन अहले सुन्नत यांनी या प्रकरणावर बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार अमिन पटेल, असलम शेख यांनीही हजेरी लावली.


मस्जिद ट्रस्टी अबुल हसन खान म्हणाले, “पोलीस जानेवारी २०२४च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत आहेत, पण अनेक वेळा डेसिबल मर्यादा पाळली जात असतानाही लाउडस्पीकर हटवले जात आहेत. ही निवडक आणि एकतर्फी कारवाई आहे.”


शहरात दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलची मर्यादा लागू आहे. मात्र, कोणतीही मोजणी न करता फक्त मशिदींवर कारवाई होत असल्याचा आरोप समाजाने केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसीम आझमी यांच्या नेतृत्वाखाली एका प्रतिनिधीमंडळाने पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन तक्रार दिली.


यासंदर्भात पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी स्पष्ट सांगितले की, “पोलीस फक्त कायद्याच्या चौकटीतच काम करत आहेत. कोणत्याही धर्माला लक्ष्य करण्याचा हेतू नाही. न्यायालयीन आदेश आणि जनहित लक्षात घेऊनच ही पावले उचलली जात आहेत.”


दरम्यान, मुंबई हायकोर्टाने २०२४ मध्ये दिलेल्या आदेशात नमूद केलं होतं की, कोणत्याही धार्मिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावणे हा मूलभूत धार्मिक अधिकार नाही. त्यामुळे त्यासाठी विशिष्ट परवानगी आणि ध्वनीमर्यादेचे पालन आवश्यक आहे.


सार्वजनिक कार्यक्रम, सण-उत्सवांवरही हीच नियमावली लागू होते, त्यामुळे एकाच निकषावर सर्वांवर कारवाई होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला शहरातील अनेक नागरिक आणि तज्ञांनी पाठिंबा दिला असून, धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्न नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या शांततेचा आणि कायदापालनाचा मुद्दा आहे, असं स्पष्ट केलं जात आहे.

Comments
Add Comment

म्हाडासह इतर शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक, मुंबईतील इतर शौचालयेही होणार आता चकाचक आणि दुर्गंधीमुक्त

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची डागडुजी तसेच सुधारणा केल्यानंतर आता याची देखभाल

दादरमधील प्रभाग १९२ कुणाकडे? उबाठा आणि मनसेमध्येच चढाओढ

मुंबई (सचिन धानजी) : उबाठा आणि मनसेची युती होणार असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीकोनातून पावले टाकली जात असली

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग ठरतो मुंबई महापालिकेसाठी पांढरा हत्ती, पुन्हा सुमारे दीडशे कोटींची निविदा मागवला

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या ताब्यात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आल्यानंतर या

महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द, उबाठा आणि मनसेने खरेदी केल्या याद्या, येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत नोंदवता येणार हरकती, सूचना

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली

डिसेंबरअखेर 'महामेट्रो' मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : या वर्षीच्या डिसेंबरअखेर दहिसर ते काशिमिरा

शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक

मुंबईतील स्वच्छतागृह होणार चकाचक आणि दुर्गंधीमुक्त सचिन धानजी मुंबई : मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची