
बनावट कीटकनाशके वाजवी दरात विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. एकदम खऱ्या ब्रँडसारखी पॅक केलेली ही बनावट रसायने शेतीसाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यांच्या वापरामुळे तसेच त्यातील घातक घटकांमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते आणि उत्पादनात घट होते. नुकत्याच झालेल्या अटकेमुळे अशा प्रकाराला आळा बसेल अशी आशा व्यक्त होते आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या बनावट कृषी रसायनांची पुरवठा साखळी तोडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चेचानी मागील सात वर्षांपासून अकरा पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट कृषी रसायनांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत होता, असा आरोप पोलिसांनी त्याच्यावर केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चेचानी दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे प्रतिष्ठित कृषी रसायन कंपन्यांचे लेबल लावलेली बनावट उत्पादने शेतकऱ्यांना वाजवी दरात विकत होता. या प्रकरणात पुढील पोलीस कारवाई आणि तपास सुरू आहे.