
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण-नाशिक मार्गावर आज भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यात घुसल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. बुधवारी रात्री १० वाजता हा कार अपघात झाला. या अपघातात नामपूर आणि देवळा येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला. तर २ जण गंभीर जखमी झाले.
चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले
प्राथमिक माहितीनुसार, नामपूर येथील भदाण कुटुंबियांच्या नातेवाईकाचे नाशिकमध्ये लग्न होते. त्यासाठी भदाण आणि मेतकर कुटुंबिय नाशिकला आले होते. लग्नानंतर हे सर्व जण कारमधून सटाण्याकडे निघाले होते. नाशिक-कळवण महामार्गावर कोल्हापूर फाटा आला तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यात घुसवली. ही कार बंगल्यात जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून बंगल्याचाही काही भाग कोसळला आहे. बंगल्याबाहेरील असलेला सिमेंट खांब वाकून कार आत घुसली. त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे समोर येते.

प्रतिनिधी: जैनिक पॉवर व केबल्स लिमिटेड (Jainik Power and Cables Limited IPO) व सचीरोमी लिमिटेड (Sacheerome Limited) या दोन एसएमई (SME) प्रवर्गतील आयपीओ (IPO) बाजारात लवकरच गुंतवणूकदारांसाठी ...
या अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तर जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.